शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूर, सांगलीच्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:01 IST

सांगली आणि कोल्हापूरमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

पुणे : पुराच्या तडाख्याने पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान सोसत आलेल्या सांगली, कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारने १०० टक्के कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. 

   पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे, महापालिका गटनेता दिलीप बराटे उपस्थित होते. 

 गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील कोल्हापूरसांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे मोठे स्वरूप समोर आल्यावर सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्ष पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच संदर्भात पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. 

     पुढे पवार म्हणाले की, या भागात जास्त प्रमाणात उसाचे उत्पादन होते. बहुतांश वेळा ऊस पिकवणारा शेतकरी हा बँकेचे किंवा सोसायटीचे कर्ज घेऊन पेरणी करतो. परंतु यंदा आलेल्या संकटामुळे त्यांचे सर्वच पीक वाया गेले आहे. काही ठिकाणी तर उसाच्या उंचीइतके पाणी आहे. त्यामुळे पीक वाया गेले असताना, संसार उद्धवस्त झाला असताना शेतकऱ्यांना नवीन पेरणीचा खर्च असताना सरकारने १०० टक्के कर्जमाफी करण्याची गरज आहे.  यामुळे द्राक्ष, ऊस आणि इतर भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • एनडीआरएफ सारखी यंत्रणा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे.

 

  • 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे.

 

 

  • कोल्हापूर आणि सांगली हा राज्यासाठी महत्वाचा भाग आहे. इथून संपूर्ण राज्यात सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. 

 

  • या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पूराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे.

 

  • सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी. 
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारfloodपूरSangliसांगलीkolhapurकोल्हापूर