शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

"सरकारला पाडायला ताकद लागते..! जयंत पाटलांनी ते करून दाखवावं" - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:50 IST

भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे

पुणे : एखादा विषय मार्गी लागेपर्यंत थांबलो नाही हा आमचा संघर्ष आहे. असा संघर्ष करून अजित पवार आमरण उपोषणाला बसले ते बघणं महाराष्ट्राला आवडेल. जयंत पाटील यांनी म्हणत रहावं सरकार पडेल म्हणून. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले,  भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. सरकारला झोपू दिलं नाही. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा संघर्ष डीएनएच नाहीये. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं. 

अंधेरी निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कोणावर काय आरोप करायचे यावर बंधन आणता येत नाही. अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काय आहे कळत नाही. त्यामुळे लोकांचं मी सांगू शकत नाही. नोटाला का मतदान झालं कळत नाही. 

जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल

नाना पटोले यांना लोक गांभीर्याने घेत नाहीये. पुण्यात नियोजन बैठकीमध्ये आमच्यावेळी विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते. त्यामुळे मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि सुनील शेळके यांचे निधी कमी केले. पण त्यांचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे.  जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल. कारण आमची सत्ता आली, निधी तर द्यावा लागेल. 'मातोश्री' किंवा 'वर्षा'मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण