शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

...पुणे जिल्ह्यात सरकारच बदललेले नाही; हर्षवर्धन पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 18:55 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज...

बारामती (पुणे) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन सत्ताबदल झाला आहे. राज्यात सरकार बदललेले आहे, मात्र पुणे जिल्ह्यात सरकार बदललेले नसल्याचे वातावरण आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीत प्रशासनाविरोधात तक्रार केली.

बारामती येथे भाजप जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंंत्री पाटील यांनी राज्यात सत्तांतर होऊन देखील प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालावर चालत असल्याची अप्रत्यक्षरीत्या तक्रार केली. यावेळी पाटील यांनी आक्रमकपणे बाजु मांडली. पाटील पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांत आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. आज विरोधी पक्षातील काही लोक रात्री अपरात्री आपल्या लोकांना भेटतात. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. मी तूमचाच असल्याचे सांगतात, आमची कामे मंजूर करण्याची मागणी करतात. भाजप नेत्यांना भेटण्याबाबत अडचण नाही. मात्र, भाजपने येथील कार्यकर्त्यांसाठी इथून पुढील काळात ‘फाटी’ आखून राजकारण करण्याची वेळ आली आहे. याबाबत बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील काळात कार्यकर्त्यांनी काळजी करु नका, बोलण्यापेक्षा आपण कृतीतून ताकत दाखवून द्या, असे आवाहन पाटील यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून आणण्याची पाटील यांनी उपस्थितांसमवेत शपथ घेतली.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा