शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

...पुणे जिल्ह्यात सरकारच बदललेले नाही; हर्षवर्धन पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 18:55 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज...

बारामती (पुणे) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन सत्ताबदल झाला आहे. राज्यात सरकार बदललेले आहे, मात्र पुणे जिल्ह्यात सरकार बदललेले नसल्याचे वातावरण आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीत प्रशासनाविरोधात तक्रार केली.

बारामती येथे भाजप जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंंत्री पाटील यांनी राज्यात सत्तांतर होऊन देखील प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालावर चालत असल्याची अप्रत्यक्षरीत्या तक्रार केली. यावेळी पाटील यांनी आक्रमकपणे बाजु मांडली. पाटील पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांत आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. आज विरोधी पक्षातील काही लोक रात्री अपरात्री आपल्या लोकांना भेटतात. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. मी तूमचाच असल्याचे सांगतात, आमची कामे मंजूर करण्याची मागणी करतात. भाजप नेत्यांना भेटण्याबाबत अडचण नाही. मात्र, भाजपने येथील कार्यकर्त्यांसाठी इथून पुढील काळात ‘फाटी’ आखून राजकारण करण्याची वेळ आली आहे. याबाबत बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील काळात कार्यकर्त्यांनी काळजी करु नका, बोलण्यापेक्षा आपण कृतीतून ताकत दाखवून द्या, असे आवाहन पाटील यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून आणण्याची पाटील यांनी उपस्थितांसमवेत शपथ घेतली.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा