शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

By राजू इनामदार | Updated: June 22, 2024 17:08 IST

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते....

पुणे : राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. जातनिहाय जनगणना करा अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. २०१४ पासून भाजपने राज्यात हे सगळे सुरू केले. नाशिक मध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असे पटोले म्हणाले.

राज्यात ३५० ओबीसी जाती आहेत. पण सरकार काही ठराविक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात ५० टक्केपक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही,तर देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देऊ. नेमके काय आहे? राहूल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जाती निहाय जनगणना सुरू केली असती. त्यातून हा प्रश्न सुटायला मदत झाली असती असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजप मध्ये गेले आणि स्वच्छ झाले,आपण शुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत सरकार ते लपवत आहे असा आरोप पटोले यांनी केला. महायुतीत महाभारत सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. विधानसभा आम्ही एकत्रच लढू. जागा वाटप सगळे एकत्र बसलो की होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. भाजप विरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे. जागा कमीजास्त मिळतील, पण सरकार बदलायचे हा आमचा निर्धार आहे असे पटोले म्हणाले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पटोलेंचे स्वागत केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा