शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

By राजू इनामदार | Updated: June 22, 2024 17:08 IST

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते....

पुणे : राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. जातनिहाय जनगणना करा अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. २०१४ पासून भाजपने राज्यात हे सगळे सुरू केले. नाशिक मध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असे पटोले म्हणाले.

राज्यात ३५० ओबीसी जाती आहेत. पण सरकार काही ठराविक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात ५० टक्केपक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही,तर देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देऊ. नेमके काय आहे? राहूल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जाती निहाय जनगणना सुरू केली असती. त्यातून हा प्रश्न सुटायला मदत झाली असती असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजप मध्ये गेले आणि स्वच्छ झाले,आपण शुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत सरकार ते लपवत आहे असा आरोप पटोले यांनी केला. महायुतीत महाभारत सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. विधानसभा आम्ही एकत्रच लढू. जागा वाटप सगळे एकत्र बसलो की होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. भाजप विरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे. जागा कमीजास्त मिळतील, पण सरकार बदलायचे हा आमचा निर्धार आहे असे पटोले म्हणाले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पटोलेंचे स्वागत केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा