शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

By राजू इनामदार | Updated: June 22, 2024 17:08 IST

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते....

पुणे : राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. जातनिहाय जनगणना करा अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. २०१४ पासून भाजपने राज्यात हे सगळे सुरू केले. नाशिक मध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असे पटोले म्हणाले.

राज्यात ३५० ओबीसी जाती आहेत. पण सरकार काही ठराविक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात ५० टक्केपक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही,तर देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देऊ. नेमके काय आहे? राहूल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जाती निहाय जनगणना सुरू केली असती. त्यातून हा प्रश्न सुटायला मदत झाली असती असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजप मध्ये गेले आणि स्वच्छ झाले,आपण शुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत सरकार ते लपवत आहे असा आरोप पटोले यांनी केला. महायुतीत महाभारत सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. विधानसभा आम्ही एकत्रच लढू. जागा वाटप सगळे एकत्र बसलो की होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. भाजप विरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे. जागा कमीजास्त मिळतील, पण सरकार बदलायचे हा आमचा निर्धार आहे असे पटोले म्हणाले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पटोलेंचे स्वागत केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा