शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

By राजू इनामदार | Updated: June 22, 2024 17:08 IST

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते....

पुणे : राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. जातनिहाय जनगणना करा अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. २०१४ पासून भाजपने राज्यात हे सगळे सुरू केले. नाशिक मध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असे पटोले म्हणाले.

राज्यात ३५० ओबीसी जाती आहेत. पण सरकार काही ठराविक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात ५० टक्केपक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही,तर देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देऊ. नेमके काय आहे? राहूल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जाती निहाय जनगणना सुरू केली असती. त्यातून हा प्रश्न सुटायला मदत झाली असती असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजप मध्ये गेले आणि स्वच्छ झाले,आपण शुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत सरकार ते लपवत आहे असा आरोप पटोले यांनी केला. महायुतीत महाभारत सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. विधानसभा आम्ही एकत्रच लढू. जागा वाटप सगळे एकत्र बसलो की होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. भाजप विरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे. जागा कमीजास्त मिळतील, पण सरकार बदलायचे हा आमचा निर्धार आहे असे पटोले म्हणाले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पटोलेंचे स्वागत केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा