शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"वाजपेयींचे सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं, याची सरकारला भीती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:23 IST

मुंबई - राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याच्या प्रश्नावरुन सरकारचा वांदा झाल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारने ...

मुंबई - राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याच्या प्रश्नावरुन सरकारचा वांदा झाल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुक्ल लादल्याने शेतकरी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे सांगत केंद्र सरकारने २४१० रुपये दराने कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. २ लाख मेट्रीक टन कांदा शासन विकत घेणार आहे. त्यामुळे, हा शेतकऱ्यांना दिलासा मानण्यात येतो. मात्र, सत्ताधारी एनडीएसोबत असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी निर्यात शुल्क लावणे चुकीचं असल्याचं म्हटलं. तसेच, सरकार कधी कधी नामर्दासारखं वागतं, अशी बोचरी टीकाही कडू यांनी केली. 

माझ्याकडे कांद्याच्या ताकदीचा लसूण आहे, कांदा खाणं लईच तुमच्या खाणं जिवावर येत असेल तर मुळा पण आहे. सरकार नामर्दासारखं वागत आहे, फक्त सत्ता टीकावी म्हणून ग्राहकांचा विचार केला, खाणाऱ्यांचा विचार केला. पण विकवणाऱ्याचा विचार सरकार का करत नाही. ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधरवली पाहिजे. मी जरी एनडीएमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजुने वक्तव्य मला करावेच लागेल, माझं ते कर्तव्यच आहे. भाव वाढल्यावर हस्तक्षेप करता, मग भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही, असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी कांदा निर्यात शुल्कावरुन सरकारला विचारला आहे. 

कांद्यावर निर्यातशुल्क लावायची गरजच नव्हती. ऑक्टोबर-नोव्हेंबर डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करुन ठेवताय?, एवढी नालायकी?. कशामुळे तर, अटलबिहारी वाजपेयींचं सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं, एवढे भीता काय तुम्ही, असा सवाल बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. 

तर कांद्याला सफरचंदासारखा भाव मिळेल

मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे मोदींचं धोरण आहे. म्हणजेच, आपल्या भारतातील प्रत्येक माल विदेशात कसा जाईल, मग शेतकऱ्यांचा कांदा विदेशात गेला तर सफरचंदाच्या भावात तो विकला जाईल ना. कांदा नाही खाल्ला तर मरत नाही, एवढी काळजी करायची गरज नाही, असे म्हणत कांदा दरवाढीवरुन ओरडणाऱ्यांवर आणि सरकारवर बच्चू कडूंनी कडक शब्दात निशाणा साधला. तसेच, प्रसंगी सरकारविरुद्ध आंदोलनही करणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं. 

ठोऊ पाऊले उचलण्याचे निर्देश - शिंदे

राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीत धावून गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आज सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृह मंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक घेऊन या प्रश्नी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या परिषदेस उपस्थित होते. 

टॅग्स :onionकांदाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBachhu Kaduबच्चू कडूGovernmentसरकार