शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सरकारला आम्हाला खरोखरच मदत करण्याची इच्छा आहे का?, लिंक सुरू पण सर्व्हरच डाऊन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:14 IST

रिक्षा संघटनांचा अनूभव, पैसे द्यायचेत की नाही असा उद्विग्न सवाल

ठळक मुद्दे संकेतस्थळावरून अर्ज दाखल करण्याची काहीच प्रक्रिया सुरू होत नसल्याचा अनुभव

पुणे: सरकारकडून बऱ्याच प्रतिक्षेनंतर रिक्षा चालकांना मदत करण्यासाठी लिंक जाहीर झाली. मात्र सर्व्हरच डाऊन असल्याने त्यावरची अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे जायलाच तयार नाही. रिक्षा पंचायतीसह आप व अन्य रिक्षा संघटनांचा आजचा दिवसभराचा हाच अनुभव होता. 

सरकारला आम्हाला खरोखर मदत करायची इच्छा आहे की नाही असा उद्वेगजनक प्रश्न रिक्षा चालक करत आहेत. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर परिवहन विभागाने transport.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ शनिवारी रात्री जाहीर केले. रिक्षा पंचायत संघटनेने रिक्षा चालकांच्या मदतीसाठी म्हणून त्यांची १२ मदत केंद्र तयार ठेवली होती. त्यापैकी अरण्येश्वर येथे नगरसेविका अश्विनी नितिन कदम यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या केंद्राचे पंचायतीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांनी उदघाटन केले. पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अश्विनी कदम व नितिन कदम ऊपस्थित होते.

मात्र या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करण्याची काहीच प्रक्रिया सुरू होत नसल्याचा अनूभव आला. पिंपरी चिंचवड मध्ये मानव.कांबळे यांच्या हस्ते सुरू झालेल्या केंद्राचाही हाच अनूभव होता असे नितीन पवार यांनी सांगितले. आप रिक्षा संघटनेनेही शहरात त्यांच्या वतीने अशीच साह्य केंद्र सुरू केली आहेत. त्यांनाही असाच अनुभव आला अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत आचार्य यांनी दिली. कोरोना निर्बंध काळात सरकारने रिक्षा चालकांंना १५०० रूपये मदत जाहीर केली आहे. त्याला महिना होऊन गेला तरीही सरकारकडून यासाठीची पद्धत जाहीर होत नव्हती. त्याचवेळी मदत जाहीर झालेल्या इमारत बांधकाम मजूर, घरेलू कामगार व फेरीवाले यांच्या बँक खात्यात हे पैसे जमाही झाले आहेत. रिक्षा चालक मात्र अजूनही ऊपेक्षितच आहेत. राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांची संख्या ७ लाख आहे. ते सर्व या मदतीसाठी पात्र आहेत.

सरकारला इतकी साधी सुविधा अद्ययावत करता येत नसेल तर कठीण आहे. रिक्षा चालकांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकारने यात त्वरीत लक्ष घालावे. असे रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले आहे. 

सरकारला खरोखरच मदत करायची आहे की नाही असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. एकतर मदत अपूरी आणि तीपण वेळेवर मिळत नसेल तर रिक्षा चालकांनी काय करायचे? असा प्रश्न आप रिक्षा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रauto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार