शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

सरकारकडून सांप्रदायिकतेला खतपाणी - मीराकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 3:16 AM

जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. पण काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जातीप्रथा का नष्ट होत नाही? जातीप्रथेने आजपर्यंत समाजाचे अतोनात नुकसान तर झालेच

पुणे : जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. पण काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जातीप्रथा का नष्ट होत नाही? जातीप्रथेने आजपर्यंत समाजाचे अतोनात नुकसान तर झालेच, पण कायम देशाच्या लोकशाही प्रणाली आणि सर्वधर्मसमभाव तत्वाला प्रचंड धोका निर्माण केला आहे. त्यात सध्याचे सरकार हे सांप्रदायिकतेला खतपाणी घालण्याचे काम करत आहे, असा आरोप लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केला आहे. ‘ये मेरे दिल की बात हैं’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.डॉ. विकास आबनावे लिखित ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान’ या बाबू जगजीवनराम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, आदी उपस्थित होते.मीराकुमार म्हणाल्या, धर्म नेमका काय कार्य करतो, हा सातत्याने मनाला भिडणारा प्रश्न आहे. माणसाच्या आतील मानवतेला देवत्व प्राप्त करुन देतो की, शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करतो. गेल्या काही वर्षात समाजात वाढणारी सांप्रदायिकता व त्यातून उत्पन्न होणारी अराजकता हा चिंतेचा विषय आहे. समाजातील काही घटकांना आजही कित्येक ठिकाणी मंदिर प्रवेशास बंदी आहे. कुठलेही सरकार असो ते ज्या काही योजना महिला, दलित, अल्पसंख्यांक किंवा इतर दुर्लक्षित घटकांसाठी राबविते, हा त्यांच्यावर केलेला उपकार आहे, अशा आविर्भावात असते. परंतु हा उपकार नाही सरकारचे ते आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी या लोकांनी सर्वस्व अर्पण केले आहे.केंद्र व राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेल्या असंतोषामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचा विजय होईल, असे मीराकुमार यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघात ‘माध्यमांचे स्वातंत्र्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. माध्यमांना विरोध करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीलाच विरोध केल्यासारखे आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन विजय झालेल्या भाजपच्या विरोधात आता सोशल मिडीयावर मोहीम सुरु झाली आहे. याचा परिणाम आगामी गुजरात निवडणुकीत दिसेल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :BJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस