शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 7:58 PM

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली....

इंदापूर (पुणे) : राजकीय कारणातून छगन भुजबळ या व्यक्तीविषयी राग असू शकतो, मात्र सर्व ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी तरी सर्व राजकीय पक्षांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात बोलताना शनिवारी ( दि.९) केले. या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकरही आले होते. हा मेळावा आटोपून परत जाताना आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रशासकीय भवनाच्या भिंतीजवळ सुरु असणाऱ्या दीपक काटे यांच्या दुधदराविषयी सुरु असणाऱ्या उपोषण आंदोलनास भेट दिली. त्या वेळी काटे यांच्या शेजारी सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांनी गो बॅक च्या घोषणा दिल्या. त्यांच्या दिशेने चप्पल व बुट भिरकावल्याची घटना घडली.

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. महसूल व पोलीस प्रशासनाला निर्वाणीचे इशारे ही दिले. ते म्हणाले की,आमचा मराठा समाजाला नव्हे तर सुरु असलेल्या झुंडशाहीला विरोध आहे. आरक्षण देणे म्हणजे 'गरीबी हटाव'चा कार्यक्रम नाही. दलित समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे नोक-या मिळाल्या. परंतू गरीबी हटली नाही. जो वर्ग खरोखरच उपेक्षित राहिला आहे, त्याला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या उपेक्षितांना आरक्षण द्यावे. त्यांना जे दिले तेच ओबीसी समाजाला द्यावे. गेल्या दोन महिन्यात दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष,निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जे काम करत आहेत,ते थांबवा. जनगणना करा. ओबीसींचा अनुशेष भरुन काढा अश्या आमच्या मागण्या आहेत, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील रात्री अपरात्री सभा घेतात. आपण पंधरा दिवसात एखादी सभा घेतो. मात्र राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला जातो. जरांगे पाटील यांच्या सभांना परवानगी कोण देतो. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुणबी दाखला एका दिवसात मिळतो. इतरांना दाखले मिळण्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी का लागतो असे सवाल भुजबळ यांनी उपस्थित केले. जरांगे यांनी आक्षेपार्ह बोलणे थांबवावे. सर्वांच्या संयमाला मर्यादा असतात.जर तो संपला तर त्याला कोणी ही आवरु शकत नाही. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल असा इशारा देत,  महाराष्ट्रातील प्रशासन देशात अव्वल मानले असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस यंत्रणेतील घटकांनी अशा बाबींकडे त्रयस्थपणे पहावे. वेळेत उपाय करावा अन्यथा काबूत येणार नाही अशी अशांतता माजेल असा इशारा भुजबळ यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, दौलतराव शितोळे, कल्याणराव दळे, राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मण हाके, पांडुरंग शिंदे, तानाजी धोत्रे यांची भाषणे झाली. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरIndapurइंदापूरmarathaमराठा