शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

साखर कारखान्यांच्या वीजनिर्मितीला चांगला दर

By admin | Updated: March 5, 2017 04:16 IST

साखर कारखान्यांना साखरेपाठोपाठ आता वीज प्रकल्पांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. वीजविक्रीमधून कारखान्यांना समाधानकारक दर मिळत आहे. मात्र, उसाच्या कमतरतेमुळे

- महेश जगताप, सोमेश्वरनगर

साखर कारखान्यांना साखरेपाठोपाठ आता वीज प्रकल्पांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. वीजविक्रीमधून कारखान्यांना समाधानकारक दर मिळत आहे. मात्र, उसाच्या कमतरतेमुळे वीजप्रकल्पांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी मेगावॉट विजेची निर्मिती केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत विजेच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. राज्यातील ११५ खासगी आणि सहकारी वीज प्रकल्पांपैकी यावर्षी १०२ च वीजप्रकल्प सुरू होऊ शकले होते. यातील १३ वीजप्रकल्प बंद होते, तर काही वीज प्रकल्प काही दिवसांतच उसाची कमतरता असल्याने बगॅसअभावी बंद करावे लागले होते. गेल्या वर्षी राज्यातील ६३ सहकारी वीजप्रकल्पांनी मिळून १ हजार २०७ मेगावॉट आणि ५२ खासगी प्रकल्पांनी मिळून २ हजार १५१ अशी ३ हजार ३५८ मेगावॉट विजेची निर्मिती केली होती. यातील १ हजार ७७२ मेगावॉट विजेची वीज वितरण कंपनीला विक्री करण्यात आली होती. मात्र, चालू वर्षी कारखाने जास्त वेळ न चालल्यामुळे वीजप्रकल्प लवकरच बंद करावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा अधिक कमी विजेची निर्मिती केल्याने भविष्यात विजेचे संकट उभे राहणार आहे.सध्या राज्यातील वीजप्रकल्प ७०० मेगावॉटची निर्मिती करीत आहे. बाहेरील कारखान्यांच्या बगॅसचा दर ३ हजार ५०० रुपये टन असल्याने बाहेरील कारखान्यांकडून बगॅस खरेदी करून विजेची निर्मिती करणे साखर कारखान्यांना परवडत नाही. त्यामुळे बहुतांश साखर कारखाने बगॅसवरच वीजप्रकल्प चालू करून बगॅस संपताच वीजप्रकल्प बंद करत आहेत.१ किलो बगॅसपासून ०.४१ युनिट वीजनिर्मिती : बिलाला उशीरएक युनिट वीज तयार करण्यासाठी साडेपाच किलो वाफ (स्टीम) लागते आणि साडेपाच किलो वाफ तयार करण्यासाठी २ किलो ४०० गॅ्रम बगॅस लागतो. एक किलो बगॅसपासून ०.४१ युनिट विजेची निर्मिती केली जाते.वीज प्रकल्पांची उभारणी केल्यानंतर, विजेला ३ रुपये पाच पैसे दर मिळत होता. त्यानंतर ४ रुपये ७९ पैसे आणि ६ रुपये ३३ पैसे दर मिळत होता. सध्या या दरामध्ये १ एप्रिल २०१६ पासून वाढ करण्यात आली आहे.सध्या वीज प्रकल्पांमधून विक्री होणाऱ्या विजेला ६ रुपये ५३ पैसे दर मिळत आहे. हा दर समाधानकारक असल्याचे वीजप्रकल्पांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महावितरण आणि वीजप्रकल्प यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार विकलेल्या विजेचे बिल हे ४५ दिवसांमध्ये देण्याचे ठरलेले असतानाही महावितरणकडून ६० ते ७० दिवसांनी हे बिल देण्यात येत आहे.प्रकल्प उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रोत्साहन जे कारखाने वीजप्रकल्प उभे करतील, अशा कारखान्यांना १० वर्षांचा खरेदी कर माफी देण्यात आली होती. तसेच, ऊसखरेदी करातही सवलत देण्यात आली होती. त्याच बरोबर वीजप्रकल्प उभे करणाऱ्या कारखान्यांना वीज प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदान देण्यात आले होते. त्या अनुदानाचा आकडा कमीत कमी ६ कोटी रुपये होता. तसेच, प्रकल्प उभा राहिल्यानंतर प्रकल्पापासून महावितरणकडे वीज नेण्यासाठी टॉवर उभे करण्यासाठी १ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.वीजप्रकल्पांचे दुखणे १ सप्टेंबर २०१६ पासून राज्य शासनाने वीजप्रकल्पांना परिपत्रक काढले असून, यामध्ये वीजप्रकल्प तयार करत असलेल्या एकूण विजेपैकी साखर कारखाने स्वत:साठी जेवढी वीज वापरतील या विजेवर एका युनिटला १ रुपया २० पैसे टॅक्स सुरू केला आहे.साधारणत: एक साखर कारखाना चालू हंगामात दोन ते अडीच कोटी युनिट विजेचा वापर करतो. यावर त्याला १ रुपया २० पैसेप्रमाणे ३ कोटी रुपये कर शासनाला भरावा लागणार आहे. याचा अर्थ सरकार एकीकडून १० वर्षांचा कर माफ करते, तर दुसरीकडून वापरणाऱ्या विजेला कर लावत आहे. अजून तरी राज्यातील एकाही वीजप्रकल्पांना हा कर भरला नसून वीजप्रकल्प संघटनेने याला विरोध दर्शविला आहे.