शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एफआरपीसाठी न्यायालयात जाणार; शेतकरी कृती समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 02:35 IST

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपी रक्कम व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपी रक्कम व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे.सतीश काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना गेल्या तीन महिन्यांपासून सुरळीत सुरू आहे. कारखान्याने ५,३५,००० मे.टन उसाचे गाळप केलेले असून सरासरी रिकव्हरी ११.७० आहे. शेतकरी सभासदांचा ऊस गाळपास गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना सोमेश्वरने अद्याप सभासदांना ही रक्कम पूर्णपणे अदा केलेली नाही. याबाबत शेतकरी कृती समितीने कारखान्याला तीन वेळा एफआरपी देण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, कारखान्याने यावर कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे मात्र वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून चालू वर्षीची एफआरपी एकरकमी देणार असल्याचे चेअरमन यांनी वारंवार जाहीर केलेले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाला केवळ राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडून बिनव्याजी एफआरपी कर्ज किंवा वाढीव वित्त साह्य योजनेतून बिनव्याजी कर्ज घेण्याचे आयोजन असून विनाकारण गरज नसताना राज्य सरकारच्या धोरणांचा फायदा घेण्याचे आपले धोरण असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. संचालक मंडळ कारखान्याच्या सभासदांचे नुकसान करून त्यांना वेठीला धरत असून त्यांचे हे धोरण चुकीचे असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.सभासदांना चालू वर्षाची एफआरपी देण्यासाठी कारखान्याने मागील वर्षी किमत चढ-उतार निधी स्वरूपात २० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; परंतु या निधीचा संचालक मंडळाने दुरुपयोग केला असल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला आहे. तसेच, कारखान्याच्या संचालक मंडळाने एफआरपी व्याजासह देणे कमप्राप्त असताना सभासदांची दिशाभूल करून कारखान्याने कोट्यवधी रुपयांच्या कामांचे साखर आयुक्त कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागू नये म्हणून छोटे छोटे अंदाजपत्रक तयार करीत असून खूप मोठा अनावश्यक खर्च करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे