शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अभिवादन यात्रेतून समतावादी विचारांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 8:23 PM

समतावादी विचारांचा जयघोष करत नगारा वदन, ढोलताशा पथक आणि शोभारथाच्या सहाय्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देगायत्री लडकत यांनी ‘मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. 

पुणे : समतावादी विचारांचा जयघोष करत नगारा वदन, ढोलताशा पथक आणि शोभारथाच्या साहाय्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. पाणी आडवा, पाणी जिरवा, स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवा यासारखे सामाजिक संदेश असलेले फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. आबालवृध्द या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिडेवाड्यापासून निघालेल्या यात्रेचा गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यात समारोप झाला. युवा माळी संघटनेसह राज्यातील विविध माळी समाज संघटनांतर्फे आयोजित या अभिवादन यात्रेचे उदघाटन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ही अभिवादन यात्रा भिडेवाडा येथून सुरू होऊन रामेश्वर चौक दत्तमंदिर मार्गे, मंडई, शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, खडकमाळ मार्गे गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा येथे पोहचली. यात्रेत डॉक्टरांचे पथक, स्वच्छता पथक आणि शालेय विद्यार्थ्यांचे पथक देखील सहभागी झाले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड,माळीनगर, सासवड, वाई, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव अशा विविध भागातील माळी संघटना सहभागी झाल्या होत्या. गायत्री लडकत यांनी महात्मा फुले वाडा येथे ‘मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. 

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळे