शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:07 IST

निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

इंदापूर - निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.पाणी मोजून बंद जलवाहिनीद्वारे शेतकºयांना उपलब्ध करून देण्याचा उपाय हितकारक ठरेल. त्यामुळे वीर भाटघर धरणामधील शिल्लक राहिलेले पाणी वेळोवेळी नीरा नदीवरील बंधाºयांमध्ये सोडता येईल. दरवर्षी पाऊसमान कमी होत चाललेले आहे, हा गैरसमज शेतकºयांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७५० मिमी आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात तीस ते चाळीस पावसाळी दिवसांत तेवढाच पाऊस पडत आहे. जून, जुलै व सप्टेंबर हा त्याचा कालावधी आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटार टाकून पाणी उपसले जात आहे. बाभुळगाव ते नृसिंहपूर भागातील नदीला पाणी सुटले, की विद्युत मोटारीने पाणी उपसतात. जांब, कुरवलीपासून नृसिंहपूर भागातील शेतकरी बंधाºयातील पाणी वापरतात. तालुक्यातून वाहणाºया नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातूनही सायफन वा विद्युत मोटारीने पाणी उचलतात. नदी, नाले, ओढे कोरडे पडतात. दुष्काळसदृश स्थिती उद्भवते.तुटपुंज्या पाण्यावर करावी लागतेय शेती४शासनाचे पाणीवाटपाचे धोरण कालबाह्य ठरत चाललेले आहे. नीरा डाव्या व उजव्या कालव्याला सोडलेले सत्तर टक्के पाणी शेतकºयांच्या शेतीपर्यंत पोहोचेस्तोवर कालव्यामधून झिरपून ओढ्या, नाल्यांना मिळते. पाणी उचलून शेतकरी आपल्या शेततळ्यात सोडतात. तुटपुंज्या प्रमाणात राहिलेले पाणी अधिकृतपणे शेतीला वापरले जाते. त्याचा पिकाला पाहिजे तसा वापर होत नाही. कारण एकदा पाटपाण्याने पाणी दिल्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याची पाळी येते. तोवर पाण्याअभावी पीक जळालेले असते.या निसर्ग वा मानवनिर्मित दुष्काळापासून शेती वाचवायची असेल तर जलसंपदा खात्याने सखोल अभ्यास करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत वापरात आणावी.पाण्याची किंमत ठरवून पाणी मोजून ते शेततळी भरण्यासाठी अधिकृतपणे शेतकºयांना द्यावे. बंद जलवाहिनीतून पाणी दिल्यास नीरा डाव्या कालव्यावर असणारा बारामती, इंदापूरच्या आसपासचा भाग सिंचित होईल. वीर भाटघर धरणात पाणी शिल्लक राहील. असेच नीरा उजव्या कालव्याच्या क्षेत्रातही दिसून येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे