शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:07 IST

निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

इंदापूर - निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.पाणी मोजून बंद जलवाहिनीद्वारे शेतकºयांना उपलब्ध करून देण्याचा उपाय हितकारक ठरेल. त्यामुळे वीर भाटघर धरणामधील शिल्लक राहिलेले पाणी वेळोवेळी नीरा नदीवरील बंधाºयांमध्ये सोडता येईल. दरवर्षी पाऊसमान कमी होत चाललेले आहे, हा गैरसमज शेतकºयांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७५० मिमी आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात तीस ते चाळीस पावसाळी दिवसांत तेवढाच पाऊस पडत आहे. जून, जुलै व सप्टेंबर हा त्याचा कालावधी आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटार टाकून पाणी उपसले जात आहे. बाभुळगाव ते नृसिंहपूर भागातील नदीला पाणी सुटले, की विद्युत मोटारीने पाणी उपसतात. जांब, कुरवलीपासून नृसिंहपूर भागातील शेतकरी बंधाºयातील पाणी वापरतात. तालुक्यातून वाहणाºया नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातूनही सायफन वा विद्युत मोटारीने पाणी उचलतात. नदी, नाले, ओढे कोरडे पडतात. दुष्काळसदृश स्थिती उद्भवते.तुटपुंज्या पाण्यावर करावी लागतेय शेती४शासनाचे पाणीवाटपाचे धोरण कालबाह्य ठरत चाललेले आहे. नीरा डाव्या व उजव्या कालव्याला सोडलेले सत्तर टक्के पाणी शेतकºयांच्या शेतीपर्यंत पोहोचेस्तोवर कालव्यामधून झिरपून ओढ्या, नाल्यांना मिळते. पाणी उचलून शेतकरी आपल्या शेततळ्यात सोडतात. तुटपुंज्या प्रमाणात राहिलेले पाणी अधिकृतपणे शेतीला वापरले जाते. त्याचा पिकाला पाहिजे तसा वापर होत नाही. कारण एकदा पाटपाण्याने पाणी दिल्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याची पाळी येते. तोवर पाण्याअभावी पीक जळालेले असते.या निसर्ग वा मानवनिर्मित दुष्काळापासून शेती वाचवायची असेल तर जलसंपदा खात्याने सखोल अभ्यास करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत वापरात आणावी.पाण्याची किंमत ठरवून पाणी मोजून ते शेततळी भरण्यासाठी अधिकृतपणे शेतकºयांना द्यावे. बंद जलवाहिनीतून पाणी दिल्यास नीरा डाव्या कालव्यावर असणारा बारामती, इंदापूरच्या आसपासचा भाग सिंचित होईल. वीर भाटघर धरणात पाणी शिल्लक राहील. असेच नीरा उजव्या कालव्याच्या क्षेत्रातही दिसून येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे