शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:07 IST

निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

इंदापूर - निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.पाणी मोजून बंद जलवाहिनीद्वारे शेतकºयांना उपलब्ध करून देण्याचा उपाय हितकारक ठरेल. त्यामुळे वीर भाटघर धरणामधील शिल्लक राहिलेले पाणी वेळोवेळी नीरा नदीवरील बंधाºयांमध्ये सोडता येईल. दरवर्षी पाऊसमान कमी होत चाललेले आहे, हा गैरसमज शेतकºयांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७५० मिमी आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात तीस ते चाळीस पावसाळी दिवसांत तेवढाच पाऊस पडत आहे. जून, जुलै व सप्टेंबर हा त्याचा कालावधी आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटार टाकून पाणी उपसले जात आहे. बाभुळगाव ते नृसिंहपूर भागातील नदीला पाणी सुटले, की विद्युत मोटारीने पाणी उपसतात. जांब, कुरवलीपासून नृसिंहपूर भागातील शेतकरी बंधाºयातील पाणी वापरतात. तालुक्यातून वाहणाºया नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातूनही सायफन वा विद्युत मोटारीने पाणी उचलतात. नदी, नाले, ओढे कोरडे पडतात. दुष्काळसदृश स्थिती उद्भवते.तुटपुंज्या पाण्यावर करावी लागतेय शेती४शासनाचे पाणीवाटपाचे धोरण कालबाह्य ठरत चाललेले आहे. नीरा डाव्या व उजव्या कालव्याला सोडलेले सत्तर टक्के पाणी शेतकºयांच्या शेतीपर्यंत पोहोचेस्तोवर कालव्यामधून झिरपून ओढ्या, नाल्यांना मिळते. पाणी उचलून शेतकरी आपल्या शेततळ्यात सोडतात. तुटपुंज्या प्रमाणात राहिलेले पाणी अधिकृतपणे शेतीला वापरले जाते. त्याचा पिकाला पाहिजे तसा वापर होत नाही. कारण एकदा पाटपाण्याने पाणी दिल्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याची पाळी येते. तोवर पाण्याअभावी पीक जळालेले असते.या निसर्ग वा मानवनिर्मित दुष्काळापासून शेती वाचवायची असेल तर जलसंपदा खात्याने सखोल अभ्यास करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत वापरात आणावी.पाण्याची किंमत ठरवून पाणी मोजून ते शेततळी भरण्यासाठी अधिकृतपणे शेतकºयांना द्यावे. बंद जलवाहिनीतून पाणी दिल्यास नीरा डाव्या कालव्यावर असणारा बारामती, इंदापूरच्या आसपासचा भाग सिंचित होईल. वीर भाटघर धरणात पाणी शिल्लक राहील. असेच नीरा उजव्या कालव्याच्या क्षेत्रातही दिसून येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे