शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:01 IST

गेल्या ६४ वर्षात विधानपरिषदेवर एकदाही प्रतिनिधित्व नाही

ठळक मुद्देयासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेणारविविध पक्ष, राजकीय संघटनांमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजाच्या नेत्यांची पत्रकार परिषद मातंग समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे मातंग समाजात नाराजीचा सूर

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे इंग्रजांनी गुन्हेगारी जमातीचा ठपका ठेवल्याने हा समाज विकासापासून वंचित राहिला. १९५६ पासून विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून आजवर समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे समाजामध्ये रोष आणि आक्रोश आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा द्वितीय क्रमांकाचा मातंग समाज आहे. त्याला दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. त्यामुळे समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले.विविध पक्ष, राजकीय संघटनांमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन याविषयी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, आरपीआयचे मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, भाजपाचे बापू कांबळे, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते.मातंग समाजातील महापुरुष साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्यात अतिशय मोलाचे योगदान दिले. या समाजात आजपर्यंत अनेक साहित्यिक, कलावंत, खेळाडू तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात असंख्य नामवंत लोक होऊन गेले परंतु राज्यपाल नामनिर्देशित सदस्यत्वासाठी मातंग समाजातील या प्रज्ञावंतांचा विचार करण्यात आलेला नाही.साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आघाडी सरकारमधील कोणत्याही पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे मातंग समाजात नाराजीचा सूर आहे.अनुसूचित जातीतील इतर जातींना विधानपरिषदेत अनेकदा संधी देण्यात आली. परंतु, आजतागायत विधानपरिषदे सारख्या या महत्त्वाच्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही. प्रत्येक वेळी मातंग समाजाच्या वाट्याला निराशाच येते. त्यामुळे राज्य स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या  कार्यकर्त्यांनी मोट बांधली असून यावेळी समाजाला संधी देण्याची मागणी करण्यात आली. प्रास्ताविक हातागळे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.-------------------मातंग समाज अशिक्षित, अज्ञानी आणि अंधश्रद्धाळू आहे. कष्टकरी आणि प्रामाणिक असलेल्या या समाजाला योग्य संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रगतीला गती मिळू शकेल. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष असल्याने समाजाला प्रतिनिधित्व देऊन समाजाचा सन्मान करावा. ही समाजाच्या सन्मानाची लढाई आहे.- सुभाष जगताप, नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेVidhan Parishadविधान परिषदSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात