शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:13 IST

स्त्रिया अधिक संयमी व संवेदनशील असल्याने त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे

पुणे: नवं भारत एका पायावर धावू शकत नाही, तर दोन पायांवर चालायचे आहे. त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रिया व मुलींना केवळ शिक्षण नाही, तर भरपूर शिक्षण द्या. पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नूलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते. यावेळी हिरकणी योजना अंतर्गत यावर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पीयूषा पांडव या तीन मुलींना दत्तक घेतले असून, कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे.

डॉ.माशेलकर म्हणाले, वस्तुस्थिती पाहता जगाच्या तुलनेत देशात महिलांना केवळ २४ टक्केच अधिकार आहे. चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनाम ७० टक्के आणि बांगलादेशही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षांपूर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणाऱ्या नोकऱ्या महिलांना दिल्या आहेत. या देशात बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, बचत योजना, कन्या श्री प्रकल्प, शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरscienceविज्ञानWomenमहिलाIndiaभारत