शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:13 IST

स्त्रिया अधिक संयमी व संवेदनशील असल्याने त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे

पुणे: नवं भारत एका पायावर धावू शकत नाही, तर दोन पायांवर चालायचे आहे. त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रिया व मुलींना केवळ शिक्षण नाही, तर भरपूर शिक्षण द्या. पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नूलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते. यावेळी हिरकणी योजना अंतर्गत यावर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पीयूषा पांडव या तीन मुलींना दत्तक घेतले असून, कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे.

डॉ.माशेलकर म्हणाले, वस्तुस्थिती पाहता जगाच्या तुलनेत देशात महिलांना केवळ २४ टक्केच अधिकार आहे. चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनाम ७० टक्के आणि बांगलादेशही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षांपूर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणाऱ्या नोकऱ्या महिलांना दिल्या आहेत. या देशात बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, बचत योजना, कन्या श्री प्रकल्प, शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरscienceविज्ञानWomenमहिलाIndiaभारत