शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

मुलींना भरपूर शिक्षण द्या! लग्नाची घाई करू नका, डॉ. रघुनाथ माशेलकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:13 IST

स्त्रिया अधिक संयमी व संवेदनशील असल्याने त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे

पुणे: नवं भारत एका पायावर धावू शकत नाही, तर दोन पायांवर चालायचे आहे. त्यासाठी स्त्रियांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रिया व मुलींना केवळ शिक्षण नाही, तर भरपूर शिक्षण द्या. पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे, असा सल्ला प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप नूलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते. यावेळी हिरकणी योजना अंतर्गत यावर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पीयूषा पांडव या तीन मुलींना दत्तक घेतले असून, कायमस्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे.

डॉ.माशेलकर म्हणाले, वस्तुस्थिती पाहता जगाच्या तुलनेत देशात महिलांना केवळ २४ टक्केच अधिकार आहे. चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनाम ७० टक्के आणि बांगलादेशही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षांपूर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणाऱ्या नोकऱ्या महिलांना दिल्या आहेत. या देशात बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, बचत योजना, कन्या श्री प्रकल्प, शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरscienceविज्ञानWomenमहिलाIndiaभारत