शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ’भारतरत्न’ द्या : क्रांतीज्योत आंदोलकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:17 AM

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे:- बहुजन समाजाच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे, शोषित आणि पीडितांमध्ये आपल्या हक्कांसाठी बंडाची मशाल पेटवणारे आणि साहित्याद्वारे वैश्विक झेप घेऊन मानवतावादाचा ध्वज उंचावणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवांकीत करावे, अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या शेकडो विचार समर्थकांनी बुधवारी क्रांतीज्योत आंदोलनाद्वारे केली.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दल, दलीत विकास आघाडी आणि कामगार सुरक्षा दलातर्फे या क्रांतीज्योत आंदोलनाचे आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ गावापासून 28 जुलै रोजी या क्रांतीज्योत आंदोलनाचा प्रारंभ झाला. तेथून कराड-सातारा-खंडाळा-शिरवळ आणि पुणे यामार्गे क्रांतीज्योतीचे  सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आगमन झाले. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली क्रांतीज्योत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य महामोर्चा द्वारे नेण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि अण्णा भाऊंच्या जयघोषाने दुमदुमलेल्या आंदोलनाद्वारे कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. यानंतर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने अण्णाभाऊ साठेंना गौरवांकीत करण्याच्या मागणीचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणे