शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

जायंट किलर 'दत्तामामा' झाले राज्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 18:30 IST

संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला नमवणारे नेते ठरले असले तरी मतदारसंघात मात्र ते 'दत्तामामा' म्हणूनच ओळखले जातात. 

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काही व्यक्तींच्या नावांना जोडलेली नाती हा त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला आपलेपणा दाखवतात  ताई, दादा, काकी, भैय्या, बाळासाहेब आणि आता त्यातलं नवीन नाव म्हणजे दत्तात्रय भरणे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला नमवणारे नेते ठरले असले तरी मतदारसंघात मात्र ते 'दत्तामामा' म्हणूनच ओळखले जातात. 

बारामतीच्या शेजारच्या इंदापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेल्या भरणे यांची कारकीर्द कधीच सोपी नव्हती. त्यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे मोठे आव्हान तेव्हाही होते आणि पुढेही असणार आहे. भरणे तसे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. बी कॉमपर्यंत शिकलेल्या भरणे यांना आमदार बनवण्यात दादांचा मोठा वाटा असला तरी भरणे यांची मेहनतही आहे. जिल्हा बँक, साखर कारखाना आणि त्यानंतर थेट पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देऊन पवार यांनी त्याला बळ दिले. भरणे यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत इंदापूरमधील प्रत्येक गावाशी संपर्क ठेवला, कार्यकर्ते निर्माण केले आणि प्रत्येक कार्याला घरोघरी भेटीही दिल्या.  भरणे यांची पायाभरणी सुरु असलेल्या काळातच पाटील यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे गावोगावी फिरणे शक्य झाले नाही आणि त्याचा झटका त्यांना २०१४साली बसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले तरी पाटील पडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण भरणे यांनी अंदाज फिरवला आणि आमदारकी पटकवली. 

२०१९साली आघाडी झाल्यावर भरणे यांनी जागा सोडण्याची तयारी दाखवली होती मात्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तो विषय संपला. त्यामुळे दुसऱ्यांदा ते लढले. अर्थात त्यांना २०१४ ते २०१९च्या काळात जपलेले संबंध आणि जनसंपर्क यांचा फायदा झाला. आणि पुन्हा एकदा राज्यात ते जायंट किलर ठरले. सर्वसाधारणपणे प्रादेशिक समतोल राखण्यासाठी अगदी शेजारच्या मतदारसंघातल्या व्यक्तींना मंत्रीपदे दिली जात नाहीत. त्यामुळे बारामतीतून अजित पवार यांचे नाव निश्चित असल्यामुळे भरणे यांच्या नावावर साशंकता होती. पण खुद्द शरद पवार यांनी आपल्या या लढवैय्या कार्यकर्त्याची निवड केल्याचे समजते. भरणेमामा हे मतदारसंघाप्रमाणेच राज्यातल्या जनतेच्या मनातही  आपले विशेष स्थान निर्माण करतील अशी आशा आहे. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारIndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस