शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साहित्य संमेलनात  ‘गझल’ दुर्लक्षितच : भीमराव पांचाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 22:12 IST

‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही.

ठळक मुद्देपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांचा संवाद

पुणे : ‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही  ‘गझल’ या साहित्य प्रकाराचा प्रसार होऊ शकेल, यासाठी अनेकदा विनंती आणि अर्ज करून झाले. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलन वगळता इतर साहित्य संमेलनात ‘गझल’ हा साहित्य प्रकार सातत्याने दुर्लक्षितच राहिला असल्याची खंत ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांनी शनिवारी व्यक्त केली.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या वेळी त्यांनी काही गझलांचे गायन केले. संघाचे खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.गझलमधील प्रत्येक शेर ही वेगळा आशय अभिव्यक्त करणारी स्वतंत्र कविता असते. त्यामुळे गझल ही कवितांची कविता आहे. काही मित्र आणि मित्रांनी धरून आणलेले चार रसिक यांच्यासमोर १९७२ मध्ये गजलगायनाची मैफल केली. तो काळ गजलसाठी प्रतिकूल होता. मात्र गझलबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. गझलेने कवितेवर आक्रमण केले असेही सांगितले गेले. पण, कुठलाही कलाप्रकार हा एकमेकांसाठी पोषकच असतो. ’भावगीत’ ही शब्दप्रधान गायकी असेल, तर गझल ही आशयप्रधान गायकी आहे. गझल गाताना आशयाला प्रधान मानले पाहिजे. रसिकांना आपली गायकी दाखविण्यासाठी नाही, तर दोन ओळीतील शेरांचा आशय पोहोचवण्यासाठी गायन करायचे, हा दंडक पाळूनच मी गझल गायन करतो, असेही त्यांनी सांगितले.त्या-त्या टप्प्यात अनेक सामाजिक विषय ऐरणीवर आले. त्यामुळे समाजाच्या संवेदना टिपणारी गझल ही सामाजिक झाली. प्रेम आणि विरह या भावनांपलीकडे जात गझलमध्ये माणसाच्या जीवन-मरणाचे प्रश्न, समाजातील विषमता असे विषय आले. गझल हा अंतर्मुख करणारा प्रकार आहे. त्यावर कोणी नाचू शकत नाही. आता कोणीही गझललेखन करू शकतो. हे गझल या काव्य माध्यमाचे बलस्थान झाले आहे,मात्र, प्रेम हाच गझलेचा स्थायीभाव आहे, तो गझलमध्ये यायलाच हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.----------------------

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतliteratureसाहित्य