शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Bhushan Gokhale: जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू घात की अपघात, ही चर्चा चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 13:43 IST

समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहे

पुणे : जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू ही शोकाकुल घटना आहे. पण त्यांचा मृत्यू हा घात की अपघात, ही चर्चा चुकीची आहे. समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहेत, असे स्पष्ट मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शनिवारी व्यक्त केले.

परममित्र प्रकाशनतर्फे विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे यांच्या ‘अविस्मरणीय युद्धकथा’ या पुस्तकावरील चर्चेत ते बोलत होते. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त कमांडर विनायक आगाशे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ अभिनेते माधव वझे, लेखक डावरे आणि प्रकाशक माधव जोशी उपस्थित होते.

लढाई कोणालाच नको असते; पण, शांततेसाठी ती करावी लागते असे सांगून गोखले म्हणाले, ‘ १९६५च्या युद्धाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे सैन्य दलात समन्वय निर्माण झाला. आज सैन्यातील तरुणांमध्ये तसेच नागरिकांमध्ये उत्साह आहे. देश बदलत आहे.’

जोशी म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी जवान मृत्यूशी करार करतात. प्रत्येक क्षणी त्यांना धोक्याशी सामना करावा लागतो. आज देशाची परिस्थिती चमत्कारिक आहे. चांगले काम झाले तरी विरोध होतो. अशा गोंधळामुळे खरी परिस्थिती सामान्य नागरिकांसमोर येत नाही. देश अवघड परिस्थितीतून जात आहे.

सैन्य दलातील जवान आणि अधिकारी देशासाठी चारित्र्य घडवतात, अशी भावना डावरे यांनी व्यक्त केली. सैन्य दलाच्या मोहिमांवर चित्रपट निघाले तर नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असे वझे यांनी सांगितले. टंगेल पूर्व पाकिस्तान येथे ११ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण आगाशे यांनी जागवली.

टॅग्स :PuneपुणेBipin Rawatबिपीन रावतForceफोर्सIndiaभारत