शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Bhushan Gokhale: जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू घात की अपघात, ही चर्चा चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 13:43 IST

समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहे

पुणे : जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू ही शोकाकुल घटना आहे. पण त्यांचा मृत्यू हा घात की अपघात, ही चर्चा चुकीची आहे. समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहेत, असे स्पष्ट मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शनिवारी व्यक्त केले.

परममित्र प्रकाशनतर्फे विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे यांच्या ‘अविस्मरणीय युद्धकथा’ या पुस्तकावरील चर्चेत ते बोलत होते. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवृत्त कमांडर विनायक आगाशे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ अभिनेते माधव वझे, लेखक डावरे आणि प्रकाशक माधव जोशी उपस्थित होते.

लढाई कोणालाच नको असते; पण, शांततेसाठी ती करावी लागते असे सांगून गोखले म्हणाले, ‘ १९६५च्या युद्धाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे सैन्य दलात समन्वय निर्माण झाला. आज सैन्यातील तरुणांमध्ये तसेच नागरिकांमध्ये उत्साह आहे. देश बदलत आहे.’

जोशी म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी जवान मृत्यूशी करार करतात. प्रत्येक क्षणी त्यांना धोक्याशी सामना करावा लागतो. आज देशाची परिस्थिती चमत्कारिक आहे. चांगले काम झाले तरी विरोध होतो. अशा गोंधळामुळे खरी परिस्थिती सामान्य नागरिकांसमोर येत नाही. देश अवघड परिस्थितीतून जात आहे.

सैन्य दलातील जवान आणि अधिकारी देशासाठी चारित्र्य घडवतात, अशी भावना डावरे यांनी व्यक्त केली. सैन्य दलाच्या मोहिमांवर चित्रपट निघाले तर नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असे वझे यांनी सांगितले. टंगेल पूर्व पाकिस्तान येथे ११ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्याने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण आगाशे यांनी जागवली.

टॅग्स :PuneपुणेBipin Rawatबिपीन रावतForceफोर्सIndiaभारत