शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गौतमी पाटील शहरात चालते, मग तमाशाला थिएटर कधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:57 IST

सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या आमच्या तमाशाला थिएटर कधी मिळणार, असा प्रश्न तमासगीर उपस्थित करत आहेत...

- दुर्गेश मोरे

पुणे : चैत्राला सुरुवात झाल्याने गावागावांमध्ये घुंगराचा छनछनाट ऐकायला मिळत आहेत. नुकतीच तमाशा पंढरी नारायणगावात कोट्यवधींच्या सुपाऱ्या फुटल्या. पण याठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न जुनाच पण नव्या पद्धतीने मांडण्यात आला. यंदा लोकनाट्यांना प्रतिसाद तसा कमीच मिळाला आहे. कारण यावेळी तरुणांना आठ-नऊ महिन्यांपासून उदयाला आलेल्या गौतमी पाटीलच्या मादक अदांचे नृत्य हवे आहे. केवळ गावागावातच नाही तर शहरातीलही तिचे शो फुल्ल झाले आहेत. घायाळ करणाऱ्या गौतमीच्या अदा पाहण्यासाठी शहरात तरुणांची तुफान गर्दी होते. मग, सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या आमच्या तमाशाला थिएटर कधी मिळणार, असा प्रश्न तमासगीर उपस्थित करत आहेत.

तमाशा ही महाराष्ट्राची लोककला. ही कला जोपासण्याचे काम महार, मांग, कोल्हाटीसारख्या १८ पगड जातींनी केली. या कलेला सर्वांनीच उचलून धरले. दिवसा उदरनिर्वाहाच्या विवंचनेत असलेला कलाकार रात्री मात्र पैशाच्या पावसात चिंब भिजून निघत असतो. शाहीर पठ्ठे बापूराव, पवळा, विठाबाई, मंगला बनसोडेंपासून ते अगदी अलीकडे सुरेखा पुणेकरांपर्यंत अनेकांनी आपल्या कलेने रसिकांची मने जिंकली. विठाबाईंच्या ठसकेबाज लावणीमुळे तर त्यांना ‘तमाशासम्राज्ञी’ पदवी मिळाली. तमाशा गावगाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तमाशा माहीत नसणारा माणूस सापडणार नाही. आज जितकी ही कला लोकप्रिय आहे, तितकीच शहरी भागात ती अडगळीत पडल्याचे वास्तव आहे.

आठ-नऊ महिन्यांपूर्वी २८ वर्षीय गौतमी पाटीलचा लोणीकाळभोरला कार्यक्रम झाला होता. ‘राती... अर्ध्या राती... असं सोडून जायाचं न्हाय न्हाय...’ या गाण्यावर थिरकल्याचा तिचा व्हिडीओ समाजामाध्यमांवर इतका झळकला की, तिच्या या मादक अदाकारीने तरुणांच्या काळजावरच थेट घाव केला. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की तुफान गर्दी होते. गडबड गोंधळ, चेंगराचेंगरीच्याही घटना घडतात. काहीवेळा आयोजकांना डीजे बंदही करावा लागतो. मांडीवर शड्डू ठोकत मादक नजर-अदांनी समोरच्याला घायाळ करत ती तरुणाईला झिंगायला लावते. कोणा पुढाऱ्याचा वाढदिवस असो वा दुकानाचे उद्घाटन असो की अन्य काही तिचा सहभाग ठरलेलाच. हे सर्व जर शहरात चालत असले तर सामाजिक प्रबोधन करणारे वगनाट्य, गण, गौळण, विनोद, रंगाबाजी असणारा तमाशा का चालत नाही. पैसे देऊन कार्यक्रम करणे तर बंदच झाले आहे. महागाई वाढत चालली आहे. अजून किती दिवस असेच भटकायचे. आम्हालाही संसार आहे. तो सावरण्यासाठी एकदा तरी शहरातील रंगमंच खुला करा, अशी साद तमाशा कलावंत घालत आहेत.

तमाशापुढे आज विविध आव्हाने उभी आहेत. पैसे देऊन तमाशा पाहण्याची पद्धत जवळजवळ संपली आहे. त्यामुळे यात्रेच्या वेळी जी काही संपूर्ण गावची एकहाती सुपारी मिळते त्यातच सर्व काही भागवावे लागते. शिवाय प्रत्येक तमाशामध्ये साधारण १५ ते २० महिला कलाकार, त्यानंतर बिगारी, चालक यांच्यासह अन्य असे मिळून साधारण १०० जण तरी असतात. या मिळालेल्या पैशातून त्यांचा पगार आणि इतर खर्च भागविताना होणारी कसरत न पहावणारी आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फटका हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक तमाशे बंद झाले अन् कलावंतांची वाताहतही झाल्याचे पाहायला मिळते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड