शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

गौतमी पाटील शहरात चालते, मग तमाशाला थिएटर कधी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:57 IST

सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या आमच्या तमाशाला थिएटर कधी मिळणार, असा प्रश्न तमासगीर उपस्थित करत आहेत...

- दुर्गेश मोरे

पुणे : चैत्राला सुरुवात झाल्याने गावागावांमध्ये घुंगराचा छनछनाट ऐकायला मिळत आहेत. नुकतीच तमाशा पंढरी नारायणगावात कोट्यवधींच्या सुपाऱ्या फुटल्या. पण याठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न जुनाच पण नव्या पद्धतीने मांडण्यात आला. यंदा लोकनाट्यांना प्रतिसाद तसा कमीच मिळाला आहे. कारण यावेळी तरुणांना आठ-नऊ महिन्यांपासून उदयाला आलेल्या गौतमी पाटीलच्या मादक अदांचे नृत्य हवे आहे. केवळ गावागावातच नाही तर शहरातीलही तिचे शो फुल्ल झाले आहेत. घायाळ करणाऱ्या गौतमीच्या अदा पाहण्यासाठी शहरात तरुणांची तुफान गर्दी होते. मग, सर्वसामान्यांचे रंजन करणाऱ्या आमच्या तमाशाला थिएटर कधी मिळणार, असा प्रश्न तमासगीर उपस्थित करत आहेत.

तमाशा ही महाराष्ट्राची लोककला. ही कला जोपासण्याचे काम महार, मांग, कोल्हाटीसारख्या १८ पगड जातींनी केली. या कलेला सर्वांनीच उचलून धरले. दिवसा उदरनिर्वाहाच्या विवंचनेत असलेला कलाकार रात्री मात्र पैशाच्या पावसात चिंब भिजून निघत असतो. शाहीर पठ्ठे बापूराव, पवळा, विठाबाई, मंगला बनसोडेंपासून ते अगदी अलीकडे सुरेखा पुणेकरांपर्यंत अनेकांनी आपल्या कलेने रसिकांची मने जिंकली. विठाबाईंच्या ठसकेबाज लावणीमुळे तर त्यांना ‘तमाशासम्राज्ञी’ पदवी मिळाली. तमाशा गावगाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी तमाशा माहीत नसणारा माणूस सापडणार नाही. आज जितकी ही कला लोकप्रिय आहे, तितकीच शहरी भागात ती अडगळीत पडल्याचे वास्तव आहे.

आठ-नऊ महिन्यांपूर्वी २८ वर्षीय गौतमी पाटीलचा लोणीकाळभोरला कार्यक्रम झाला होता. ‘राती... अर्ध्या राती... असं सोडून जायाचं न्हाय न्हाय...’ या गाण्यावर थिरकल्याचा तिचा व्हिडीओ समाजामाध्यमांवर इतका झळकला की, तिच्या या मादक अदाकारीने तरुणांच्या काळजावरच थेट घाव केला. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की तुफान गर्दी होते. गडबड गोंधळ, चेंगराचेंगरीच्याही घटना घडतात. काहीवेळा आयोजकांना डीजे बंदही करावा लागतो. मांडीवर शड्डू ठोकत मादक नजर-अदांनी समोरच्याला घायाळ करत ती तरुणाईला झिंगायला लावते. कोणा पुढाऱ्याचा वाढदिवस असो वा दुकानाचे उद्घाटन असो की अन्य काही तिचा सहभाग ठरलेलाच. हे सर्व जर शहरात चालत असले तर सामाजिक प्रबोधन करणारे वगनाट्य, गण, गौळण, विनोद, रंगाबाजी असणारा तमाशा का चालत नाही. पैसे देऊन कार्यक्रम करणे तर बंदच झाले आहे. महागाई वाढत चालली आहे. अजून किती दिवस असेच भटकायचे. आम्हालाही संसार आहे. तो सावरण्यासाठी एकदा तरी शहरातील रंगमंच खुला करा, अशी साद तमाशा कलावंत घालत आहेत.

तमाशापुढे आज विविध आव्हाने उभी आहेत. पैसे देऊन तमाशा पाहण्याची पद्धत जवळजवळ संपली आहे. त्यामुळे यात्रेच्या वेळी जी काही संपूर्ण गावची एकहाती सुपारी मिळते त्यातच सर्व काही भागवावे लागते. शिवाय प्रत्येक तमाशामध्ये साधारण १५ ते २० महिला कलाकार, त्यानंतर बिगारी, चालक यांच्यासह अन्य असे मिळून साधारण १०० जण तरी असतात. या मिळालेल्या पैशातून त्यांचा पगार आणि इतर खर्च भागविताना होणारी कसरत न पहावणारी आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फटका हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक तमाशे बंद झाले अन् कलावंतांची वाताहतही झाल्याचे पाहायला मिळते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड