शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोणी काळभोर परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची टोळी पुण्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:05 IST

गुन्हेगार व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करत असे

पुणे : लोणी काळभोर परिसरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपार केले आहे.

प्रणव भारत शिरसाठ (वय २०, रा. लोणी स्टेशन), अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय २०, रा. लोणी काळभोर) आणि सौरभ गोविंद इंगळे (वय २१, रा. इराणी वस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार प्रणव शिरसाठ हा आपल्या साथीदारांसह लोणी काळभोर गाव व परिसरात कोयता, कुर्हाड व इतर घातक शस्त्रेजवळ बाळगून नागरिक, व्यापारी व इतरांना धाक दाखवून प्रसंगी मारहाण करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने हप्ते वसुल करीत असतात. त्यांनी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन परिसरात जबरदस्ती दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या तिघांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन प्रणव शिरसाट टोळीला पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष काळे आणि त्यांच्या पथकाने तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य केले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी