शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा रस्त्यावरील टोलमुक्तीची गडकरींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या रस्त्यावरील अपूर्ण कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांच्या अभ्यासाचे काम एक संस्था करत असून, लवकरच अहवाल सादर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गांवरील विविध रस्ते व पुलांच्या १३४ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण शुक्रवारी (दि. २४) गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी टोलमुक्तीची महत्त्वाची घोषणा केली. या मागणीसाठी विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होत्या. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डाॅ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

चौकट

पुणे-बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा

“पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी एक पुणे-बंगळुरु महामार्ग आहे. या महामार्गावर ‘ग्रीन हायवे ऍक्सीस कंट्रोल’ बांधला जात आहे. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्यातली गर्दी, वाहतूक कोंडी कमी होईल,” असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. या महामार्गाचे सादरीकरण लवकरच महाराष्ट्र सरकारला देऊन कामाला सुरुवात करू, असे ते म्हणाले.

चौकट

पुण्यातली गर्दी ‘अशी’ वळवणार

“आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये उत्तरेतील पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथून जाणारी वाहतूक मुंबईतून जाते. ही वाहतूक सुरतलाच थांबवण्याचे ठरवतो आहे. सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल ते चेन्नई असा १२७० किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधला जाणार आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे मुंबई-पुण्यातली वाहतुकीची गर्दी कमी होईल. शिवाय सध्याचा सोळाशे किलोमीटरचा महामार्ग १२७० किलोमीटरचा होईल. यामुळे दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.