शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभारावर रोष

By admin | Updated: July 1, 2015 23:49 IST

चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी : चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. या विषयास ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘ग्राहकांना भरमसाठ वीजबिलाचा शॉक’ या शीर्षकाखाली लोकमतने बुुधवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले. मीटरचे छायाचित्र न घेताच अंदाजे सरासरी रीडिंग टाकून बिल पाठविण्याचा प्रकार शहरातील सर्वच भागांत वाढला आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तडजोड केल्याचे दाखवीत रक्कम थोडी फार कमी केली जाते. मात्र, पुढील बिलात पुन्हा ही रक्कम वाढून येते. पुन्हा तक्रार करीत वेगवेगळी कार्यालये पालथी घालावी लागतात. यात वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. काहींना मुदतीनंतर बिले पाठविली जातात. त्यामुळे वाढीव बिलासोबत दंडाची रक्कमही भरावी लागते. हा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांची काहीच चूक नसते. या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापारी, लघुउद्योजक यांच्या तक्रारी आहेत. वीजजोड खंडित कारवाईमुळे अंधारात राहण्याची वेळ येईल म्हणून नाईलाजास्तव अनेक जण निमूटपणे बिल भरून मोकळे होतात. मात्र, वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणा होताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अधिक रक्कम भरावी लागत आहे. पिंपळे गुरव येथील चक्रनारायण नाथन यांनी अधिक रीडिंगचे बिल येत असल्याची तक्रार पिंपरी विभागीय कार्यालयात केली. मीटर तपासा किंवा तो बदलून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मीटरची तपासणी करून रीडिंग चुकीचे येत असल्यास ते बदलून दिले जाणार असल्याचे पिंपरीचे कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ तीनच तक्रारीपिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत एक लाख ८० हजार ग्राहक आहेत. पिंपरीत केवळ ३ तक्रारी आल्या. भोसरीत तर एकही तक्रार आली नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येतो. पिंपरी कार्यालयात वाढीव वीज बिल आले असून, मीटर बदलून द्यावा,अशी एक तक्रार पिंपळे गुरव येथील रहिवाशाने केली. तीन दिवसांसाठी तात्पुरता वीजजोड घेतला होता. त्यासाठी भरलेली सुरक्षा ठेव परत करावी, अशी तक्रार जाधव कॉलनी, पिंपरीतील एकाने केली. ही ठेव गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भरली होती. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना भाडेकरूस वीजजोड दिल्याची तक्रार दापोडीतील एका रहिवाशाने केली. या संदर्भात बिलिंग विभागाचे श्रीकृष्ण बागे आणि तांत्रिक विभागाचे एस. एम. क्षीरसागर यांनी तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींवर त्वरित तोडगा काढण्याचा सूचना कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी दिल्या आहेत. भोसरीत एकही तक्रार आली नाही, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांनी दिली. नियमितपणे तक्रारी येतात. फोनवरही तक्रारी घेतल्या जातात. अधिकारी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्वरित कारवाई होऊन नागरिकांचे समाधान केले जाते. त्यामुळे तक्रार निवारण दिनाची कोणी वाट बघत बसत नाही. पाच वर्षांपूर्वी १० ते २० तक्रारी या दिवशी येत. सध्या ही संख्या नाही इतकी आहे. गेल्या महिन्यातही एकही तक्रार आली नाही, असे भरणे यांनी सांगितले.