शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 15:12 IST

आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी दिला साश्रु नयनांनी निरोप 

पाईट : भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान अमर रहे यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. आसाम येथे कार्यरत असताना खेड तालुक्यातील कुरकुंडीच्या वीर जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय.३०)  या भारतमातेच्या सुपुत्राचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी साश्रु नयनांनी निरोप दिला.

कुरकुंडी येथील मुळ असलेले संभाजी ज्ञानेश्वर राळे हे लष्करात कार्यरत होते. आसाम येथे लष्करी सेवा बजावत असतांना आजारी असल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने शुक्रवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावरून लष्कराच्या विशेष वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कुरकुंडी येथे नेण्यात आले. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. यानंतर फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनात त्यांची गावातून अंतयात्रा काढण्यात आली. त्याची सांगता राष्ट्रीय विद्यालया प्रांगणात झाली.

लष्करातर्फे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती.  सकाळी १० वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. बंदुकीच्या २१ फैरी झाडत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.  साश्रु नयनांनी शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे अमर रहे अशा घाेषणा देत त्यांना ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला. 

 ------

टॅग्स :KhedखेडIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यूSoldierसैनिक