शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयप्रश्नी केवळ चर्चाच

By admin | Updated: September 30, 2015 01:35 IST

गेल्या काही महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’सारखे एफटीआयआयच्या प्रश्नावर केवळ ‘चर्चे पे चर्चा’च घडत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’सारखे एफटीआयआयच्या प्रश्नावर केवळ ‘चर्चे पे चर्चा’च घडत आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने एफटीआयआयच्या विद्यार्थी शिष्टमंडळाशी मंगळवारी मुंबईत जी चर्चा केली ती सकारात्मक झाली असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या बैठकीतही एफटीआयआयच्या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नसल्याने येत्या १ आॅक्टोबरला मंत्रालयाची समिती आणि विद्यार्थी यांच्यात पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ रंगणार असून, या प्रश्नावर अंतिम मार्ग निघण्याची शक्यता आहे. गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करावी आणि एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेकरिता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११० वा दिवस होता. मंत्रालयाच्या वतीने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतरच पहिल्यांदा मुंबई येथे मंत्रालय व विद्यार्थी यांच्यात काहीशी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या बैठकीमधून अंतिम तोडगा निघेल असे वाटले होते. मात्र झाली केवळ चर्चाच! एफटीआयआयच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने संजय गुप्ता (सहसचिव-चित्रपट), दीपक शर्मा (उपसचिव) व मुकेश शर्मा (फिल्म डिव्हिजन संचालक, मुंबई) या त्रिसदस्यीय समितीसमोर आपल्या मागण्या मांडल्या. हरिशंकर नच्चिमुथ्थु, विकास अर्स, रणजित नायर, रिमा कौर, मालयाज अवस्थी, अजयन अडाट, शायनी जी. के या सात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने समितीबरोबर चर्चा केली. मात्र या चर्चेतही आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. मात्र समितीने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन स्वत:ची मतं स्पष्ट केली. हे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी काय तोडगा काढता येईल, यासंदर्भातील पुढील चर्चा येत्या १ आॅक्टोबरला फिल्म डिव्हिजनमध्ये होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)