शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लूट ; लॉकडाऊनच्या परिस्थितीचा उचलला जातोय फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:26 IST

आठवडे बाजार, विविध कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने लिलाव बंद

ठळक मुद्देनफेखोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी 

बारामती : कोरोनामुळे आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा उचलत व्यापारीवर्गाने कवडीमोल किमतीत शेतमाल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समित्या बंद असल्याने तयार झालेला शेतमाल मिळेल त्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओल्या दुष्काळानंतर आलेल्या या मोठ्या संकटामुळे त्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. तर व्यापारी व दलाल वर्ग यापरिस्थितीत प्रचंड नफेखोरी करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे. कोरोना साथीच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा परिणाम शेतमालावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतमाल वाहतुकीची परवानगी जरी देण्यात आली असली तरी आठवडे बाजार, विविध कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने लिलाव बंद आहेत.  त्यामुळे मोठया प्रमाणातील शेतमाल विक्रीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.  नेमक्या याच संकटाचा फायदा उठवत व्यापारी वर्ग साखळी करून शेतमालाचे दर पाडू लागला आहे. केळी,  द्राक्ष,  तसेच काहीप्रमाणात डाळिंबाचे पीक शेतात काढणीला आले आहे.  वाढत्या उष्णतेमुळे 'सनबर्निंग' चा धोका वाढतो. या फळबागा परिस्थिती निवळेपर्यंत शेतकरी ठेवू शकत नाही. मागील 20 दिवसांपूर्वी 8 ते 10 रुपये किलो असणारा केळीचा दर अवघ्या 4 रुपयांवर आला आहे. मात्र हीच केळी विक्रेते ग्राहकांना 60 ते 70 रुपये डझनने विकत असल्याचेही चित्र आहे. तर 90 ते 100 रुपये किलो असणारा निर्यातक्षम द्राक्षमाल 30 रुपये प्रतिकिलोने विकावा लागत आहे. अशीच परिस्थिती तरकारी पिकांची झाली असून मातीमोल किमतीत फळभाज्यांची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र यामध्ये व्यापारी,  दलाल,  स्थानिक विक्रेत्याचे उखळ पांढरे होऊ लागले आहे.  

.......................

नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : पांडुरंग रायते शासनाचे सर्व लक्ष सध्या साथरोग निवारणाकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट व्यापारी वर्गाकडून सुरु आहे. या संकटाचा परिणाम शेती व्यवसायावर दीर्घकालीन स्वरूपात होणार आहे. नफेखोरी टाळण्यासाठी शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळले पाहिजे.  त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाची किंमत ठरवता येईल.  सध्याच्या परिस्थितीत नफेखोरी करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केली.  

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांसोबत गुरुवार (दि. 2) व शुक्रवारी (दि.3) बैठकीसाठी बोलावले आहे. शनिवारपासून बाजार समितीत शेतमालाचे लिलाव सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करणार आहोत. - अरविंद जगताप,सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्याfruitsफळेbusinessव्यवसाय