शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'एफआरपीमुळे दूध उत्पादक वेठबिगार होतील', शेतकरी संघटनेच्या रघूनाथदादा पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:08 IST

दूध उत्पादकाला कमीत कमी मोबादला देऊन लुटण्याचा हा प्रकार...

-रविकिरण सासवडेबारामती : दुधाला एफआरपी लागू केल्यास ऊस कारखानदारीेची जी सध्याची अवस्था आहे तशीच अवस्था दूध धंद्याची भविष्यात होईल. केवळ नफा कमवण्यासाठी  दूध उत्पादकाला एफआरपीचे गाजर दाखवून दूध संस्थांच्या दावणीला बांधले जाईल. दूध उत्पादकाला कमीत कमी मोबादला देऊन त्यांना लुटण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत राज्य सरकारच्या दूध एफआरपी उपसमितीच्या निवडीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे.

दराच्या प्रश्नांवरून राज्य सरकारने दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमली आहे. एफआरपीच्या या मुद्द्यावर शेतकरी संघटनांनी मात्र आक्षेप घेतला आहे. एफआरपी ऐवजी आरएसएफ (Revenue share factor, महसुली उत्पन्नातील वाटणी) प्रमाणे दुधाला दर द्यावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, शेतकऱ्यांनी एफआरपी (उचीत आणि लाभदायक किंमत) याला विरोध करायला हवा. ऊस कारखानदारीतील नफेखोरीप्रमाणेच दुध संस्था सुद्धा यामुळे नफेखोरी करू लागतील. कायदेशीरबाबींप्रमाणे आरएसएफ प्रमाणे दूध उत्पदाकचा उत्पन्नातील वाटा ठरला पाहिजे. दूध आणि दुधापासून जे फस्ट प्रॉडक्ट तयार होतात त्यातील ७० टक्के रक्कम ही कच्च्या उत्पादकाला मिळायला हवी. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये दूध संस्थांनी भागवले पाहिजे.

एफआरपीच्या चर्चेमुळे जी परिस्थिती ऊस शेतीची झाली आहे. तिच परिस्थिती दूध धंद्याची होण्याची शक्यता आहे. आरएसएफनुसार दुधाचा दर बाजारातील किंमतीप्रमाणे ठरवणे गरजेचे आहे. ग्राहक ६० रूपये लिटरने दूध विकत घेत आहे. याठिकाणी ७०/३० सुत्र लागू करणे गरजचे आहे. यातील ४२ रूपये प्रतिलिटर दर हा दूध उत्पादकाला मिळायली हवा. तर उर्वरित १८ रूपयांमध्ये दूध संस्थांनी लिटर मागचा खर्च भागवावा. सी रंगराजन समितीच्या अहवालामध्ये देखील ७०/३० चे सुत्र आहे. यानुसार दर दिला तरच दूध धंदा टिकून राहिल अन्यथा ग्राहकाला निकृष्ठ दर्जाचे दूध खावे लागेल. निकृष्ठ दुधामुळे भविष्यात मोठ्या रोगराईचा सामना करावा लागू शकतो.एफआरपी लागू केल्यास दूधधंद्याचा उकिरडा होईल : पांडुरंग रायतेऊसाला एफआरपी लागू केली. त्यानंतर बहूतांश कारखाने  ऊसाची एफआरपी कमी देण्यासाठी  रिकव्हरी चोरायला लागले. ऊस कारखानदारीमधील सव्वातीन टक्के रिकव्हरी राज्य शासनाने नियम करून चोरली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला प्रतिटन १ हजार रूपयांचा तोटा झाला. दुधाला एफआरपी लागू केल्यास भविष्यात दुधाचे फॅट व एसएनएफ चा रेषो बदल केला जाईल. या रेषोमुळे दूध उत्पादकाला कसे कमीत कमी पैसे दिले याची काळजी दूध संस्था घेतील हा खुप मोठा धोका आहे.- पांडुरंग रायतेजिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmilkदूधBaramatiबारामती