शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आळंदीतील पवित्र इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्तता करा- आमदार दिलीप मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:16 IST

पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली आहे...

आळंदी : राज्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून इंद्रायणीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातून लाखो लिटर रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात आहे. याकडे पर्यावरण विभाग पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. मात्र नदी प्रदूषणाचा फटका इंद्रायणीलगत असलेल्या अनेक गावांना सहन करावा लागत आहे.

तीर्थक्षेत्र आळंदीची लोकसंख्या सुमारे ५० हजारांच्या घरात आहे. या ठिकाणी राज्यातून महिन्याला लाखो भाविक येत असतात. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातून इंद्रायणी नदीत मिसळणारे रसायन मिश्रित सांडपाणी आळंदीकरांच्या तसेच भाविकांच्या पदरी पडत आहे. सद्यस्थितीत आळंदीत डोळ्याची साथ पसरली आहे. तसेच काहींना कावीळ रोगाची लागण झाली आहे.

पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अनेकदा पिंपरी - चिंचवड महापालिकेला नोटीस बजावली गेली आहे. परंतु, महापालिका प्रशासन त्याला जुमानत नाही. त्यामुळे याबाबत गांभीर्याने लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाPuneपुणे