शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या '' पार्सल '' सेवेत नागरिकांची होतेय लूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:24 IST

पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून दररोज सुमारे १०० टन सामान इतर शहरांमध्ये पाठविले जाते.

ठळक मुद्देरेल्वेचा पार्सल विभाग : एजंटांची गर्दी, जादा पैशांची मागणी, प्रशासन ढिम्म पार्सल आल्यानंतर सहा तासात नेले नाही तर पुढील प्रत्येक तासासाठी १० रुपये दंड २० किलोचे पार्सल गाडीत भरण्यासाठी अतिरिक्त १०० रुपये

पुणे : तिकीट आरक्षणाचे डिजिटायझेशन झालेले असताना दुसरीकडे पार्सल विभाग मात्र अजूनही कागदी घोडे नाचवत आहे. त्यातच विभागात पार्सल आरक्षित करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांभोवती एजंटांची गर्दी होत आहे. त्यांच्याकडून अवाजवी शुल्क घेतले जात असून प्रशासन त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे पार्सल नेण्यास उशीर झाल्यास नागरिकांनाच त्याचा दंड भरावा लागत आहे. तर पार्सल गाडी चढविण्यासाठी वेगळे पैसे उकळले जात असल्याचे चित्र समोर आहे. पुणेरेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून दररोज सुमारे १०० टन सामान इतर शहरांमध्ये पाठविले जाते. त्यामध्ये १० टक्के रेल्वे प्रवासी व ५० टक्के इतर सामान्य नागरिकांचे सामान असते. पार्सल विभागात आल्यानंतर नागरिकांना सामानाचे वजन व पाठविण्याचे ठिकाण यानुसार शुल्क आकारले जाते. त्याची पावतीही दिली जाते. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. पण या विभागात पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या नागरिकांना तिथे गेल्यानंतरच एजंटांचा विळखा पडतो. काय, कुठे पाठवायचेय, सगळे काम करून देतो, एवढे पैसे होतील, असे सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर तिथेही जवळपास तेवढेच पैसे सांगितले जातात. त्यामुळे नागरिकांची पावले पुन्हा एजंटकडेच वळत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले.औरंगाबादला दुचाकी पाठविणाºया एका तरूणाने सांगितले की, एजंटने आरक्षणाची पावती, गाडीचे पॅकिंग व गाडी रेल्वेत चढविण्याचे एकुण १२०० रुपये घेतले. त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा ते केवळ आरक्षणासाठी ८०० ते ९०० रुपये आणि पॅकिंग बाहेरून करावे लागेल, असे सांगितले.  एंजटकडून सर्वच काम करून दिले जात असल्याने त्यांनाच प्राधान्य दिल्याचे तरूणाने नमुद केले. त्याआधारे ‘लोकमत’ प्रतिनिधीने स्कुटर आग्रा येथे पाठविण्याबाबत एका एजंटला विचारले, तेव्हा त्याने २५०० ते २८०० रुपये तर दुसऱ्या एजंटने २२०० ते २३०० रुपये सांगितले. त्यानंतर विभागात बसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने २ ते अडीच हजार शुल्क आकारले जाईल, तर गाडीचे पॅकिंग बाहेर करावे लागेल असे स्पष्ट केले. बाहेर खासगी लोकांसाठी पॅकिंगसाठी ३५० ते ४५० रुपये आकारले जातात. ही पॅकिंग म्हणजे गाडीला केवळ पोती गुंडाळली जातात. -----------फुकटचा दंडरेल्वेच्या नियमानुसार पार्सल आल्यानंतर सहा तासात नेले नाही तर पुढील प्रत्येक तासासाठी १० रुपये दंड भरावा लागतो. पण नागरिकांना पार्सल पार्सलचा ठावठिकाणा लागत नसल्याने इच्छित ठिकाणी पार्सल कधी पोहचणार याची कल्पनायेत नाही. त्यामुळे अनेकांना वेळेवर माहिती न मिळाल्याने फुकटचा दंड भरावा लागतो. अभिषेक गुप्ता यांना त्यांची दुचाकी कधी आली हे न समजल्याने दोन तास विलंब झाला व त्यासाठी २० रुपये दंड भरावा लागला. त्यामुळे रेल्वेने याबाबत स्वतंत्र यंत्रणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वेच्या कोणत्याही पार्सल विभागात अधिकृत एजंट नाहीत. नागरिकांनी केवळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच पार्सल बुकींग करावे. यामध्ये गाडीत पार्सल चढविण्याचे शुल्क असते. त्यामुळे एकदा बुकींग केल्यानंतर पुन्हा कशासाठीही शुल्क द्यावे लागत नाही. पण पॅकिंग नागरिकांनीच करावे लागते. हे काम रेल्वे कर्मचारी करत नाहीत. तसेच नागरिकांना कोणत्याही वेळेत पार्सल नेता यावे यासाठी कार्यालय चोवीस तास खुले असते. त्यामुळे सहसा दंड भरावा लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी एजंटकडे न जाता थेट रेल्वे कर्मचाºयांकडेच चौकशी करावी.- संजय सिंग, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक..........मध्य रेल्वे, पुणे विभाग आरक्षणाच्या शुल्कामध्येच पार्सल गाडीत टाकण्याचे पैसे घेतले जातात. पण तिथे एजंटला स्वतंत्र पैसे द्यावे लागतात. पैसे न दिल्यास वाहन कधी व कोणत्या गाडीत जाईल, याची शाश्वती नसल्याचे कोंढव्यातील गौरव सिंग यांनी सांगितले. त्यांच्याकडून २० किलोचे पार्सल गाडीत भरण्यासाठी अतिरिक्त १०० रुपये घेतले होते. --------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेfraudधोकेबाजीpassengerप्रवासी