शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खेड तालुक्यात भिमानदी पुलावरून चारचाकी थेट पात्रात! नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:48 IST

गाडीचा पुढचा टायर फुटल्याने सुटला ताबा

ठळक मुद्देएका शेतकरी बांधवाने चालकाला गाडीची काच फोडून बाहेर काढले

दावडी: खेड तालुक्यातील खरपुडी येथे भीमा नदीच्या पुलावरून जाणाऱ्या चारचाकीचा पुढचा टायर फुटल्याने थेट नदी नदीत पडल्याची घटना सकाळी घडली आहे. एका नागरिकाने तातडीने गाडीची काच फोडून चालकाला बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. संतोष गाजरे (रा. तळेगाव ता मावळ ) असे चारचाकी चालकाचे नांव आहे.

खरपुडी खुर्दे ते खरपुडी बुद्रुक या दोन गावांना जोडणाऱ्या भिमानदीवर पुल आहे. आज सकाळी संतोष गाजरे हे सेझ प्रकल्प येथे कामासाठी त्यांची चारचाकी गाडी घेऊन जात होते. दरम्यान सकाळी आठ वाजता भिमानदी पुलावर आल्यानंतर गाडीचा पुढचा एक टायर अचनाक फुटला. वाहन व्हायबल होऊन चालक गाजरे यांचा वाहनावरील ताबा सुटला. पुलाचे ३ सिंमेट कठडे तोडून ते थेट नदीत मध्ये कोसळले. त्यानंतर मोठा आवाजही आला होता. 

खरपुडी येथील शेतकरी किसन गाडे नदीकाठ लगत शेतात गवत कापत होते. गाडी नदीत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ते धावत पळत नदीत उतरले. गाडीत पाणी शिरल्यामुळे चालक गाजरे यांना दरवाजा उघडता आला नाही. गाडे यांनी क्षणांचाही विलंब करता प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडली. दरवाजा ओढून गाजरे यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. अजून काही काळ गेला असता तर जीव गेला असता मात्र, किसन गाडे हे देवासारखे धावून आल्यामुळे माझा जीव वाचला अशी प्रतिक्रिया संतोष गाजरे यांनी दिली.

घटनास्थळी पोलिस हवालदार सुदाम घोडे यांनी जाऊन पंचनामा करून नदीत पडलेली चारचाकी क्रेनच्या मदतीने बाहेर काढली. खरपुडी येथील पुलावर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. बंधाऱ्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा असते. सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा पुलावरून वाहतूक करताना सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला. या पुलाला संरक्षक लोखंडी कठडे उभारावेत अशी मागणी खरपुडी गावचे पोलिस पाटील दादा निकाळजे, एन.टी गाडे, प्रदिप चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडAccidentअपघातPoliceपोलिस