शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे भेटले योगायोगाने एकाच गावात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 6:37 PM

उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख...

वालचंदनगर : सोशल मीडियामुळे हल्ली संपूर्ण जग एका क्लिकवर आल्याचे बोलले जाते. याच सोशलमीडियावर पााहिजे ती गोष्टी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. यातल्या बऱ्याच गोष्टी हाताशी लागतात. काही सापडतात तर काही तशाच कायम तपासावर शिक्का घेवून अनुत्तरीत राहतात. पण उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख... अशाच दुर्लक्षित घटकातील घिसाडी समाजातल्या एका कुटुंबातील तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे योगायोगाने इंदापूर तालुक्यातील एका गावात परत भेटले. त्यावेळी त्या भावडांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. जांब ता. इंदापूर येथे हा प्रसंग घडला. रामा, भीवा, राघु,सोमा घिसाडी आपल्या आईवडिलांचा पारंपारिक घिसाडी व्यवसाय करून गेल्या ३० वर्षांपासून हे ४ भावंडे एकमेकांपासून दुरावले होते. दरवर्षी त्यांचे गाव ठरलेले असल्यामुळे मजल दरमजल करत आपली उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करताना एका कुटुंबाचे आगमन इंदापूर तालुक्यातील जांब या गावात झाले होते. थोरला भाऊ त्याच दिवशी रणगाव येथील काम उरकून बारामतीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला घिसाडी आलेले दिसले. त्याने आपला घोड्याचा गाडा जागेवर थांबून पाहिले तेव्हा सख्खा भाऊ समजले. त्यानंतर दोन दिवसांनी या कुटुंबाचा मुक्काम वाढला आणि आणखी दोन भावांचे कुटुंब त्या गावात दाखल झाले. चारही भाऊ आपआपल्या बायका पोरां संसारासह एकमेकांना त्याक्षणी भेटले. त्यामुळे चार भावंडाचा संसार प्रत्यक्षात पाहावयास मिळाले त्यावेळी मिळकत व परिस्थितीपेक्षा एकमेकांच्या चौकशीत मग्न होते. एक घोडा गाडीचे चार गाड्या झाल्या हेच त्यांच्या कुटूंबाची एकत्रित संपत्ती दिसून आल्याने रामा, भीवा, सोमाच्या चेहऱ्यावर आनंदच ही आनंद दिसत होता. पुन्हा चारही घोडा गाड्या एकत्रितपणे पोटापाण्यासाठी दुसऱ्या गावाला धुराळा उडत दौडू लागल्या..-------

टॅग्स :Indapurइंदापूर