शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

पुणे जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार नळाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 22:25 IST

जलजीवन अंतर्गत चार लाख नळजोड जिल्हा परिषदेचा उपक्रम पाणीटंचई वर मात करण्यासाठी निर्णय

जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी येत्या तन वर्षात १ हजार ८७३ गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणीची कामे जलजिवन मिशन अंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या साठी जलजिवनच्या २ हजार ७७३ कोटींच्या आरखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून दोन हजर योजनांची कामे केली जाणार असून याचा लाभ ३ लाख ७८ हजार ५६९ कुटुंबांना होणार आहे.जलजीवन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर प्रतिपाणसी प्रतिदिन या प्रमाणे वैयक्तिक नळजोडणीची कामे येत्या ३ वर्षात केली जाणार आहे. ही कामे लक्षात घेऊन जलजिवन योजनेचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यायोजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा हिस्सा उचलणार आहे. तर प्रत्येक गावांना लोकवर्गणीची १० टक्के अट घालण्यात आली आहे. त्यासाठी ५ टक्के रोख आणि पाच टक्के श्रमदाान अशा स्वरूपात लोकसहभाग असणार आहे. जजिल्ह्यात ३४६ गावांमध्ये १०० टक्के नळजोडणीचीकामे यापूर्वी झालेली आहेत. नव्याने १ हजार ८७३ गावांमध्ये नळयोजनेची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी २ हजार ७४३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये या वर्षी ४१४ गावामंध्ये२४३ कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यातून सात हजार कुटुंबांना नळजोडणीद्यारे पाणी पुरविण्यात येणार आहे. तर त्यापुढील वर्षात ९६९ गावांमध्ये एक लाख ९८ हजार ८०१ कटुंबांना नळजोडणी २ हजार १३७ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२२-२३ या वर्षात ४९० गावांसाठी ३६२कोटी रूपये खर्च करून १ लाख २० हजार ७७३ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

यंदा टंचाई आराखड्याला दिली बगल

जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेमार्फतपाणी टंचाई निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार केला जातो. जिल्हाधिाकाऱ्यांकडून या आराखड्याला मंजुरी दिली जाते. या वर्षी ४३ कोटी रूपयांच्या या आरखड्याला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा समावेश जलजिवन मिशनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या आरखड्यातील कामे करता येणार नाही. त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे यापुढे जलजीवन मिळनमधून करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील ग्रामपंचायती १ हजार ३९९

 

एकुण गावे १ हजार ८७३

एकुण वाड्या वस्त्या ९१३०

 

एकुण कुटुंब संख्या ९८०१८९

नळ जोडणी नाेंदणी कुटुंबे ६०१३४०

 

नळ पाणी पुरवठा योजना नसलेली गावांची संख्या : २०, मुळशी (७) आंबेगाव (४), जुन्नर (३), हवेली (३), भोर (२), खेड (१)

नळ जोडणी नसलेली कुटुंबे ३ लाख ७८ हजार ८४९

 

-----

चौकट

 

१०३ गावे होणार टँकरमुक्त

जिल्ह्यात दरवर्षी १०३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या गावात पाणी योजना नसल्याने अनेक अडचणी येतात. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत कामे केली जाणार आहे

याविषयी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की या वर्षी टंचाई आराखड्याचा समावेश जलजिवन मिशन अंतर्गत करण्यात आला आहे. या द्वारे पाणी योजनांची आणि नळजोडणीची कामे जिल्ह्यात केली जाणार आहे. येत्या दोन वर्षात सर्व कुटुंबाना नळजोडणी देण्याचे उद्दीष्ट असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी