शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा ; २१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:43 IST

शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

पुणे : शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज येथील या शाळेतील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी'च्या २१ विद्यार्थ्यांना आणि एका  शिक्षिकेने सकाळी १०च्या सुमारास शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ली.  खातानाही त्यांना रॉकेलचा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तासाभराने त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेने तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४ दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणाऱ्या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे. 

गेली दोन  दिवसापासून खिचडीभात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. दोन दिवसांपूर्वी सुद्धा भात खाल्यावर मुलांना त्रास झाला होता. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता असा आरोप पालक कैलास पाचापूरे यांनी केला आहे.खिचडीभातालादरम्यान या प्रकरणी स्थानिक नगरसेवकांनीही आक्षेप घेत मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :katrajकात्रजSchoolशाळाEducationशिक्षण