शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धान्य बाजाराने दिली भाववाढीची ‘हमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:18 IST

हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली.

ठळक मुद्देस्थानिक बाजारात झाली भाववाढ : बाजारातील भाव वाढलेदरवाढ अर्थातच खरीप हंगामाचे पीक बाजारात आल्यानंतर लागू होणारकेंद्र सरकारचा भात, तूर, मूग आणि उडीद डाळीसह १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय

पुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीकांना चांगला भाव देण्याची हमी देताच स्थानिक धान्य बाजारात धान्याचे भाव वाढले. तांदळाच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० आणि डाळींच्या भावात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ पोहोचली आहे.    केंद्र सरकारने भात, तूर, मूग आणि उडीद डाळीसह १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ अर्थातच खरीप हंगामाचे पीक बाजारात आल्यानंतर लागू होणार आहे. हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली. तूरडाळीच्या दरात प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५ हजार ८०० ते ६ हजारांवर गेले आहे. मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ते ६ हजार ७०० ते ७ हजार आणि उडीद डाळीचे भाव २०० ते तीनशे रुपयांनी वाढून ४ हजार २०० ते ५ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहेत. या डाळींचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचे भाव दोनशे रुपयांनी वाढून, ते ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर गेले असल्याची माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली. बासमती आणि अकरा-एकवीस या जातीच्या तांदळाच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती तांदळाचा प्रतिक्विंटल भाव ९ ते ९ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. कोलम तांदूळ दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढून ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. आंबेमोहोरच्या भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा प्रतिक्विंटलचा भाव साडेपाच ते साडेसहा हजार रुपयांवर गेला आहे. सर्वाधिक खप असलेले सोनामसुरी, मसुरी आणि कोलम तांदळाच्या भावात वाढ झाली नसल्याचे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. भाताच्या हमीभावात वाढ केल्याने झालेली ही तात्पुरत्या स्वरुपाची वाढ आहे. मात्र, बाजारात तितकीशी मागणी नसल्याने ही दरवाढ टिकणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.     

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीfoodअन्नFarmerशेतकरी