शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धान्य बाजाराने दिली भाववाढीची ‘हमी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:18 IST

हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली.

ठळक मुद्देस्थानिक बाजारात झाली भाववाढ : बाजारातील भाव वाढलेदरवाढ अर्थातच खरीप हंगामाचे पीक बाजारात आल्यानंतर लागू होणारकेंद्र सरकारचा भात, तूर, मूग आणि उडीद डाळीसह १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय

पुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीकांना चांगला भाव देण्याची हमी देताच स्थानिक धान्य बाजारात धान्याचे भाव वाढले. तांदळाच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० आणि डाळींच्या भावात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ पोहोचली आहे.    केंद्र सरकारने भात, तूर, मूग आणि उडीद डाळीसह १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ अर्थातच खरीप हंगामाचे पीक बाजारात आल्यानंतर लागू होणार आहे. हमीभावात वाढ करण्याचा निर्णय जाहीर होताच चोवीस तासांच्या आतच स्थानिक बाजारातील धान्याच्या भावाने देखील उसळी घेतली. तूरडाळीच्या दरात प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५ हजार ८०० ते ६ हजारांवर गेले आहे. मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ते ६ हजार ७०० ते ७ हजार आणि उडीद डाळीचे भाव २०० ते तीनशे रुपयांनी वाढून ४ हजार २०० ते ५ हजार २०० रुपयांवर पोहोचले आहेत. या डाळींचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचे भाव दोनशे रुपयांनी वाढून, ते ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर गेले असल्याची माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली. बासमती आणि अकरा-एकवीस या जातीच्या तांदळाच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती तांदळाचा प्रतिक्विंटल भाव ९ ते ९ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. कोलम तांदूळ दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढून ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. आंबेमोहोरच्या भावात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा प्रतिक्विंटलचा भाव साडेपाच ते साडेसहा हजार रुपयांवर गेला आहे. सर्वाधिक खप असलेले सोनामसुरी, मसुरी आणि कोलम तांदळाच्या भावात वाढ झाली नसल्याचे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. भाताच्या हमीभावात वाढ केल्याने झालेली ही तात्पुरत्या स्वरुपाची वाढ आहे. मात्र, बाजारात तितकीशी मागणी नसल्याने ही दरवाढ टिकणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.     

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीfoodअन्नFarmerशेतकरी