शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नद्यांचे प्रवाही राहणे अत्यंत आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:58 IST

शैलेंद्र पटेल : जागतिक नदी दिन, जलस्रोत हेरिटेज व्हावेत

भारतातील सर्व नद्या वाहत्या राहिल्या पाहिजेत आणि त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी नदीप्रेमी लढत आहेत. सध्या आपल्या शहरातील मुळा-मुठा नद्या प्रदूषित झाल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणचे जलस्रोत बुजविण्यात येत आहेत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. झरे, जलस्रोतांचे पाणी ड्रेनेजमध्ये जात आहे. ते रोखले पाहिजे.

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आंतरराष्ट्रीय नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आम्ही नदीप्रेमी रविवारी (दि. ३०) एक दिवसीय उपोषण करणार आहोत. कारण नदी ही आपली जीवनवाहिनी आहे. तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या नदी दिनानिमित्त आम्ही सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एक तर जे जिवंत पाण्याचे झरे आहेत. ते संरक्षित झाले पाहिजेत. कारण त्याचे पाणी थेट नदीला गेले तर नदी वाहती राहील. ओढे, नाले आणि नैसर्गिक जलस्रोत यांना जपलेच पाहिजे. त्यांच्याद्वारे दररोज हजारो लिटर पाणी वाहते. हे पाणी नदीला मिळाले, तर नदी कायम वाहत राहून ती प्रवाही होईल. त्यामुळे तिच्यात जिवंतपणा येईल. दुसरे म्हणजे जलस्रोत, विहिरी, झरे यांचे संरक्षण करायचे असेल, तर ते संरक्षित व्हायला हवेत. त्यासाठी गावाचा नकाशा, डीपी प्लान यामध्ये हे जलस्रोत दाखवले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात विकास करताना ते बुजले जाणार नाहीत. संबंधित ठिकाणी विहीर, पाण्याचा झरा आहे, हे लगेच लक्षात येऊ शकते. सर्व नकाशात जागा आरक्षित करून ते अधोरेखित करणे गरजेचे आहे.तिसरे म्हणजे या जलस्रोतांचे अधिकार एकाच व्यक्तीकडे दिले पाहिजेत. कारण अनेक ठिकाणी त्याचे अधिकारी असतील, तर त्याबाबत कोणाला विचारणार? म्हणून एका व्यक्तीकडे अधिकार द्यावेत.सध्या एखादा दोन पदरी रस्ता असेल, तर तो सहा पदरी करण्यासाठी भूसंपादन करण्यात येते. वाहने वाढत आहेत. त्यांच्यासाठी जागा तयार केली जाते. परंतु, नदी, नाले, ओढे यांची रुंदी उलट कमी केली जात आहे. खरंतर यांची रुंदी वाढवली पाहिजे. कारण हे जीवन देणारे प्रवाह आहेत. पण याकडे गांभीर्याने कोणीही पाहत नाही. त्यासाठी सध्या नव्या भूजल कायद्यासाठी आम्ही हरकती, सूचना पाठवत आहोत. नागरिकांनीही त्यात सहभाग घ्यावा. भूजल चांगले राहिले, तर पाणी मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी भूजलात पाणी मुरत असेल, तर त्याला वॉटर रिचार्ज एरिया म्हटले जाते. तो भाग संरक्षित केला पाहिजे. त्यामुळे पाऊस झाला की, पाणी मुरून भूजलाची पातळी संतुलित राहू शकते. मी गेल्या अनेक वर्षांपासून अजून एका गंभीर विषयावर काम करीत आहे. आपल्या शहरात आणि परिसरात जे जिवंत झरे आहेत, त्यांना हेरिटेजचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. हा विषयदेखील महत्त्वाचा आहे. जर हेरिटेजचा दर्जा मिळाला, तर हे जिवंत जलस्रोत भविष्यात लाखो लिटर पाणी देतील. शहरात अनेक ठिकाणचे जिवंत जलस्रोत बुजविले आहेत. बावधन परिसरातील राम नदीची हीच अवस्था आहे. सध्या नदीची स्थिती पाहवत नाही. ती सुधारली पाहिजे. गंगा नदी वाचविण्यासाठी स्वामी सानंदजी गेल्या काही दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुण्यातही उपोषण करीत आहोत. खरं तर स्वामी सानंद यांच्याकडे सरकारचे लक्षच नाही. हे लक्ष वेधण्यासाठी उद्या (दि. ३०) जलप्रेमी उपोषण करतील. नदी रुंद जागेत, बिनधास्तपणे वाहत राहिली पाहिजे, हाच एक आमचा ध्यास आहे.मानव जातीला जिवंत ठेवणारे जलस्रोत जिवंत राहण्यासाठी भूजल मार्ग व पाणलोट क्षेत्राच्या जागा गृहीत करून त्यांचे संरक्षण गरजेचे आहे. कारण जलस्रोत जिवंत राहिले, तर आपल्याला लाखो लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. रविवारी (दि. ३०) जागतिक नदी दिन आहे. त्यानिमित्ताने तरी महापालिकेने याबाबत विचार करावा, यासाठी आम्ही नदीप्रेमी प्रयत्न करीत आहोत. कारण नदी ही जीवनदायिनी आहे, असे जलदेवता संघ अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.