शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

पूरस्थितीला केवळ हवामान आणि मान्सूनला जबाबदार धरता कामा नये : डॉ. रंजन केळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 07:00 IST

ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते.

ठळक मुद्दे मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत...

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने पुणे शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले.. यात अनेक दुर्घटना घडल्या, कुठे झाडे कोसळली तर कुठे भिंती खचल्या..ठिकठिकाणी पाणी साचले, तर कधी दुकाने, घरे,दवाखाने सर्वच ठिकाणी पाणी शिरले.. या सर्व अपघातांमुळे बरेच कुटुंब रस्त्यावर आले..  पै पै साठवलेली पुंजी रक्कम , काडी काडीने जमवलेला संसार असं सार काही एका क्षणार्धात उध्वस्त झाले.नेमकं पुण्यात काय घडतंय.. ? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत भारतीय हवामान खात्याचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांच्याशी साधलेला हा संवाद ..  

- नम्रता फडणीस     * गेल्या काही वर्षात नैॠत्य मान्सूनचं गणित बदललंय का? _- यंदाच्या वर्षी मान्सून हा कुतुहलाचा विषय झाला असून, लोकांना आता तो त्रासदायक वाटायला लागलाय. यापूर्वी असा पाऊस कधी पडलाचं नव्हता का?  असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हवामानशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं. प्रत्येक मान्सूनचं एक वैशिष्ट्य असतं, पाऊस एखाद्या वर्षी कधी अधिक तर कधी कमी पडतो. आताचा जो पाऊस पडत आहे. तो काहीसा निराळा आहे. मान्सून जेव्हा प्रस्थापित होतो. तेव्हा त्याचे ढग हे विस्तीर्ण असतात. शेकडो किलोमीटर  लांब पसरलेले हे ढग मध्यम उंचीचे असतात. त्यातून जो पाऊस पडतो तो सुखदायक आणि रिमझिम असतो. पण आगमन आणि परतीच्या पावसावेळचे  ढग काहीसे वेगळे असतात. जे छोटे, स्थानिक आणि 15 ते 16 किमी उंचीचे असतात त्यातून पाऊस पडतो तो एकाच ठिकाणी पडतो आणि मग स्थानिक भागात पाणी जमा होते. कारण त्याचा निचरा होत नाही. मग वृत्तपत्रात मथळे येतात  पुणे शहर पाण्यात तुंबले..! * एखाद्या भागात अधिक पाऊस झाला की तात्काळ 'ढगफुटी' किंवा 'अतिवृष्टी' झाली असे म्हटले जाते? - मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अमुक एका वेगापेक्षा जास्त वेगाने पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि ' ढगफुटी' ही बहुतांश वेळेला डोंगराळ भागात होते. ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते. यावरून त्या ढगाचे वजन किती असेल याचा अंदाज येऊ शकतो. ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. तेव्हा जमिनीच्या वरून जाणारे काही तरंग असतात जे ढगाला उचलून धरतात. एखाद्या डोंगराळ प्रदेशात जिथे तरंग जात नाहीत तिथे एखादे बूड काढल्यासारखे ढगातून पाणी पडते. हा फरक जाणून घेतला पाहिजे. त्यामुळे कुठेही जास्त पाऊस झाला तर 'ढगफुटी' झाली अशी धारणा ठेवू नये.   * सप्टेंबरच्या अखेरीस इतका पाऊस का होत आहे? त्यामागची कारणे काय आहेत?- खरंतर मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे असतात. नैॠत्य मान्सून असे आपण म्हणतो तेव्हा नैॠत्यकडून वारे येतात आणि ते अरबी समुद्रावरचे बाष्प घेऊन महाराष्ट्रात येतात. मात्र सहा महिन्यांनी मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते आणि मग ईशान्य पूर्व भागाकडून मान्सूनचे वारे वाहायला लागतात. ज्याला ईशान्य मान्सून म्हणतात. जे महाराष्ट्रात पोहोचत नाहीत. ईशान्यकडून येणारे वारे हे बंगालच्या खाडीवरचे बाष्प घेऊन येतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणेला जो पाऊस होतो तो ईशान्य मान्सून होतो. नैॠत्य आणि ईशान्य हे दोन वेगळे मान्सून नाहीत तर ती केवळ स्थित्यंतरे आहेत. सप्टेंबरच्या शेवटी जे पाहात आहोत ते स्थित्यंतर आहे. मान्सूनला काही झालेले नाही तर तो परत चालला आहे. परतीच्या वेळेस मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते. आपल्याकडे सध्या वारे वाहात आहेत ते उत्तरेकडून येत आहेत. हवामानाच्या स्थित्यंतरामुळे वातावरणाची परिस्थिती बदलते. बाष्पीभवन, थोडी उष्णता अशी एक अस्थितरता असते. विजा चमकतात, गडगडाट होतो. पूर स्थितीला केवळ पाऊस आणि हवामानाला जबाबदार धरता कामा नये. बरेचसे दोष आपणच निर्माण केले आहेत. * अजून किती दिवस मान्सूनच्या या स्थितीचा सामना करावा लागेल?-नैॠत्य मान्सूनचे रूपांतर ईशान्य मान्सूनमध्ये होण्यास सुरूवात झाली आहे. आजच्या परिस्थितीची गंभीरता काहीशी कमी होईल. *  ' हवामान बदल''  हा मान्सून बदलला कारणीभूत ठरतोय  का?- आज ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पूर्वीच कधी पाहिल्या नव्हत्या. कदाचित या पुन्हा होत राहातील अशी भीतीही वाटत राहाते. पण या गोष्टींना काहीही आधार नाही. हवामान खात्याकडे दीडशे वर्षांपूवीर्ची मान्सूनची आकडेवारी आहे. त्यातून हे दिसते की पूवीर्ही असे घडले आहे. त्यामुळे आज जे झाले ते पुन्हा होईल अशी भीती बाळगू नये. हवामानबदलामुळे मान्सूनवर विपरित परिणाम होतो  आणि दुष्काळ पडतो असंही म्हटलं जातं. पण यावर्षी दुष्काळ नव्हे तर महापूर आलाय. जेव्हा आपण हवामान बदल म्हणतो तेव्हा त्याला परिस्थितीही कारणीभूत असते. शेतकरी शेतीच्या पद्धतीही बदलत आहेत. उदा: मराठवाड्यात आंबा लावला जातो. हवामान बदलाबरोबर आपण जे इतर बदल केले आहेत तेही ध्यानात घेतले पाहिजेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान