शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीला केवळ हवामान आणि मान्सूनला जबाबदार धरता कामा नये : डॉ. रंजन केळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 07:00 IST

ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते.

ठळक मुद्दे मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत...

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने पुणे शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले.. यात अनेक दुर्घटना घडल्या, कुठे झाडे कोसळली तर कुठे भिंती खचल्या..ठिकठिकाणी पाणी साचले, तर कधी दुकाने, घरे,दवाखाने सर्वच ठिकाणी पाणी शिरले.. या सर्व अपघातांमुळे बरेच कुटुंब रस्त्यावर आले..  पै पै साठवलेली पुंजी रक्कम , काडी काडीने जमवलेला संसार असं सार काही एका क्षणार्धात उध्वस्त झाले.नेमकं पुण्यात काय घडतंय.. ? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत भारतीय हवामान खात्याचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांच्याशी साधलेला हा संवाद ..  

- नम्रता फडणीस     * गेल्या काही वर्षात नैॠत्य मान्सूनचं गणित बदललंय का? _- यंदाच्या वर्षी मान्सून हा कुतुहलाचा विषय झाला असून, लोकांना आता तो त्रासदायक वाटायला लागलाय. यापूर्वी असा पाऊस कधी पडलाचं नव्हता का?  असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हवामानशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं. प्रत्येक मान्सूनचं एक वैशिष्ट्य असतं, पाऊस एखाद्या वर्षी कधी अधिक तर कधी कमी पडतो. आताचा जो पाऊस पडत आहे. तो काहीसा निराळा आहे. मान्सून जेव्हा प्रस्थापित होतो. तेव्हा त्याचे ढग हे विस्तीर्ण असतात. शेकडो किलोमीटर  लांब पसरलेले हे ढग मध्यम उंचीचे असतात. त्यातून जो पाऊस पडतो तो सुखदायक आणि रिमझिम असतो. पण आगमन आणि परतीच्या पावसावेळचे  ढग काहीसे वेगळे असतात. जे छोटे, स्थानिक आणि 15 ते 16 किमी उंचीचे असतात त्यातून पाऊस पडतो तो एकाच ठिकाणी पडतो आणि मग स्थानिक भागात पाणी जमा होते. कारण त्याचा निचरा होत नाही. मग वृत्तपत्रात मथळे येतात  पुणे शहर पाण्यात तुंबले..! * एखाद्या भागात अधिक पाऊस झाला की तात्काळ 'ढगफुटी' किंवा 'अतिवृष्टी' झाली असे म्हटले जाते? - मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अमुक एका वेगापेक्षा जास्त वेगाने पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि ' ढगफुटी' ही बहुतांश वेळेला डोंगराळ भागात होते. ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते. यावरून त्या ढगाचे वजन किती असेल याचा अंदाज येऊ शकतो. ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. तेव्हा जमिनीच्या वरून जाणारे काही तरंग असतात जे ढगाला उचलून धरतात. एखाद्या डोंगराळ प्रदेशात जिथे तरंग जात नाहीत तिथे एखादे बूड काढल्यासारखे ढगातून पाणी पडते. हा फरक जाणून घेतला पाहिजे. त्यामुळे कुठेही जास्त पाऊस झाला तर 'ढगफुटी' झाली अशी धारणा ठेवू नये.   * सप्टेंबरच्या अखेरीस इतका पाऊस का होत आहे? त्यामागची कारणे काय आहेत?- खरंतर मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे असतात. नैॠत्य मान्सून असे आपण म्हणतो तेव्हा नैॠत्यकडून वारे येतात आणि ते अरबी समुद्रावरचे बाष्प घेऊन महाराष्ट्रात येतात. मात्र सहा महिन्यांनी मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते आणि मग ईशान्य पूर्व भागाकडून मान्सूनचे वारे वाहायला लागतात. ज्याला ईशान्य मान्सून म्हणतात. जे महाराष्ट्रात पोहोचत नाहीत. ईशान्यकडून येणारे वारे हे बंगालच्या खाडीवरचे बाष्प घेऊन येतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणेला जो पाऊस होतो तो ईशान्य मान्सून होतो. नैॠत्य आणि ईशान्य हे दोन वेगळे मान्सून नाहीत तर ती केवळ स्थित्यंतरे आहेत. सप्टेंबरच्या शेवटी जे पाहात आहोत ते स्थित्यंतर आहे. मान्सूनला काही झालेले नाही तर तो परत चालला आहे. परतीच्या वेळेस मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते. आपल्याकडे सध्या वारे वाहात आहेत ते उत्तरेकडून येत आहेत. हवामानाच्या स्थित्यंतरामुळे वातावरणाची परिस्थिती बदलते. बाष्पीभवन, थोडी उष्णता अशी एक अस्थितरता असते. विजा चमकतात, गडगडाट होतो. पूर स्थितीला केवळ पाऊस आणि हवामानाला जबाबदार धरता कामा नये. बरेचसे दोष आपणच निर्माण केले आहेत. * अजून किती दिवस मान्सूनच्या या स्थितीचा सामना करावा लागेल?-नैॠत्य मान्सूनचे रूपांतर ईशान्य मान्सूनमध्ये होण्यास सुरूवात झाली आहे. आजच्या परिस्थितीची गंभीरता काहीशी कमी होईल. *  ' हवामान बदल''  हा मान्सून बदलला कारणीभूत ठरतोय  का?- आज ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पूर्वीच कधी पाहिल्या नव्हत्या. कदाचित या पुन्हा होत राहातील अशी भीतीही वाटत राहाते. पण या गोष्टींना काहीही आधार नाही. हवामान खात्याकडे दीडशे वर्षांपूवीर्ची मान्सूनची आकडेवारी आहे. त्यातून हे दिसते की पूवीर्ही असे घडले आहे. त्यामुळे आज जे झाले ते पुन्हा होईल अशी भीती बाळगू नये. हवामानबदलामुळे मान्सूनवर विपरित परिणाम होतो  आणि दुष्काळ पडतो असंही म्हटलं जातं. पण यावर्षी दुष्काळ नव्हे तर महापूर आलाय. जेव्हा आपण हवामान बदल म्हणतो तेव्हा त्याला परिस्थितीही कारणीभूत असते. शेतकरी शेतीच्या पद्धतीही बदलत आहेत. उदा: मराठवाड्यात आंबा लावला जातो. हवामान बदलाबरोबर आपण जे इतर बदल केले आहेत तेही ध्यानात घेतले पाहिजेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान