शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुरात वाहुन आलेले साप शिरले मानवी वस्तीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:47 IST

पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते..

ठळक मुद्देसर्पमित्रांची कऱ्हा नदीकाठी सर्पबचाव मोहीम; ८३ सापांना जीवदान

बारामती : पुरंदर तालुक्यात गराडे गावी फाटलेल्या आभाळाचा फटका कऱ्हेच्या काठाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.यामध्ये अनेकांच्या संसाराची वाताहत झाली.त्याचप्रमाणे मुके जीव देखील यातुन सुटले नाहीत.नदीकाठी असणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.  मात्र, याचवेळी पुराच्या पाण्यात वाहुन आलेले शेकडो साप रस्त्यावर येवुन वाहनांखाली चिरडले जात होते.तर मानवी वस्तीत शिरलेले साप मारले जात होते. या मुक्याजीवांना वाचविण्यासाठी कोणी वाली नव्हता.याचवेळी शहरातील निसर्गप्रेमी युवकांनी,सर्पमित्रांनी पुढाकार घेत सुमारे ८३ सापांना पकडुन वनविभागात सोडत जीवदान दिले.

मुक्या प्राण्यांबदद्ल समाजातील संवेदनशीलता नेहमी अनुभवास येते.मात्र,अनेकदा ती केवळ बोलण्यामध्ये,संभाषणामध्येच असते. मुक्याप्राण्यांबदद्ल संवेदनशीलता कृतीत आणणारे दुर्मिळच असतात. शहरातील नेचर फ्रेंडस ऑर्गनायझेशन ही निसर्गप्रेमी युवकांची संघटना त्यापैकीच एक  आहे. सापांसह वन्यजीव मुक्या जीवांसाठी या संस्थेतील युवक काम करतात. या युवकांनी पुरपरीस्थितीमध्ये मानवी वस्तीत घुसलेल्या पुरातील सापांना शिताफीने पकडत जीवदान दिले.तसेच,रस्त्यावरील वाहनांखाली चिरडल्या जाणाऱ्या सापांना वाचवले.त्यामुळे पुर परिस्थितीत माणसांप्रमाणेच मुक्या जीवांसाठीदेखील संरक्षण यंत्रणा राबविली गेली.परिणामी ८३ सापांना यातुन जीवदान दिले.यासाठी अन्नपाण्याची काळजी न करता १५ पेक्षा अधिक सर्पमित्रांचे पथक सुमारे १० तास कार्यरत होते. सायंकाळी उशिरापर्यंत काम करणारे पथक बारामतीकरांच्या कौतुकाच विषय ठरले आहे. नदीला पुर आल्याने पात्रातील साप नदीकाठच्या काही घरांमध्ये शिरले.यामध्ये काही साप घरात शिरले.यावेळी सर्पमित्रांना हे साप पकडण्यासाठी बोलविण्यात आल्यानंतर सापांच्या बचाव कार्याला सुरूवात झाली.

कारण एक दोन नव्हे तर अनेक घरांमध्ये हे साप शिरल्याचे निरोप सर्पमित्रांना आले.याचवेळी काही निसर्गप्रेमींना कऱ्हा नदीपात्रालगतच्या रस्त्यावर पुराच्या पाण्यातुन मोठ्या प्रमाणात साप बाहेर येत आहेत.बाहेर आलेले साप वाहनांखाली चिरडले जात असल्याची माहिती देखील सर्पमित्रांना मिळाली.त्यानंतर या सर्वांनी एकत्र येत सापांना वाचविण्यास मोहीम राबविली. ती मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.

नाग,घोणस या सापांचे प्रमाण यामध्ये अधिक होते. तर जमिनीवर आढळणारा कवड्या हा बिनविषारी साप यावेळी सापडल्याने सर्पमित्र चक्रावुन गेले आहेत.तसेच पाणदिंड्या (हिरवा) साप मोठ्या प्रमाणात आढळला.तसेच धामण साप यामध्ये आढळला नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.शहरातील खंडोबानगर,नागवडे वस्ती,म्हाडा कॉलनी भागातील घरांमध्ये साप आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.यामध्ये बबलु कांबळे,श्रीकांत पवार,अक्षदशहा,अक्षय गांधी,श्रेयस कांबळे, पारस मेहता आदी सर्पमित्रांचे योगदान महत्वपुर्ण ठरले.———————————————....नदीकाठी घरात साप शिरण्याचा धोका अधिक

ऑर्गनायझेशन चे प्रमुख बबलु कांबळे यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले ,पुरस्थितीनंतर १५ दिवस सापांचा धोका आहे.सध्या पुराच्या पाण्यातुन बाहेर आलेले साप अडगळीत लपुन राहतात.भुक लागल्यावर हे साप बाहेर येतात.विशेषत नदीकाठच्या घरांमध्ये हे साप शिरण्याचा धोका अधिक आहे.पुरस्थिती पुर्ववत झाल्यावर सबंधितांनी घरात जाताना , घरातील सामान काढताना दक्षता घ्यावी. काठीच्या सहाय्याने सामान काढावे.साप, विंचवासारखे प्राणी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यापार्श्वभुमीवर सावधानता बाळगण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीfloodपूरsnakeसापriverनदीRainपाऊस