शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पुणे शहराला ओढ्यांची ‘मिठी’ : पुरंदर, बारामतीमध्ये कऱ्हा कोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:27 IST

९०० च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपुरात २० बळी; ३ बेपत्ताबुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात आंबिल ओढ्याला प्रचंड पूर पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना बुधवारी रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. 

पुणे : पुणे शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कऱ्हा नदीने रौद्र रुप धारण केल्याने उडालेल्या हाहाकारात १५ जणांचा बळी गेला. ८ जण वाहून गेल्याने बेपत्ता आहेत. ९००च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे. झोपडपट्ट्यांबरोबरच आलिशान सोसायट्या आणि बंगल्यांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नागरिक भयभित झाले होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले. पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना बुधवारी रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. 

..............अरण्येश्वर येथील टांगा कॉलनीतील घराची भिंत पडून सहा जणांचा मृत्यू  झाला. यामध्ये जान्हवी  सदावर (वय ३२)  त्यांचा मुलगा  मुलगा श्रीतेज (वय ९), रोहित आमले (वय १५)  वस्तीतील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे संतोष कदम (वय ५५) हे रिक्षाचालक यांचा समावेश आहे. याच वस्तीतील लक्ष्मीबाई पवार (वय ७०) आणि ज्योस्ना राणे (वय ३०) या दोघी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्या...........खेडशिवापूरमध्ये पावसाने चौघांचे प्राण गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरती श्याम सूर्यवंशी (वय ३५),  शाम रामलाल सूर्यवंशी (वय ४०) आणि त्यांची मुलगी गौरी (वय १४) यांचा मृत्यू झाला. साईनाथ सोपान भालेराव (वय ३५)  यांचा मृत्यू झाला. फकीर राजू (वय ४०) आणि एका तृतीयपंथीयाचाही मृतदेह सापडला आहे. मुसळधार पावसामुळे  ससेवाडी, गोगलवाडी, शिंदेवाडी, वेळू, कासुर्डी या भागातील ओढ्याचे पाणी खेडशिवापुर जवळ एकत्र आले.  ........सिंहगड रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात मोटार वाहून जाऊन किशोर दत्तात्रय गिरमे (वय ५४) यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र पांडुरंग बवले (वय ४२) यांचाही बुडून मृत्यू झाला. अमृता आनंद सुदामे (वय ३७) या परिचारिका दुचाकीवरून जात असताना वाहनू गेल्या. सनसिटीजवळील मैदानावर त्यांचा मृतदेह सापडला. ..........वानवडी परिसरात वाहणाºया भैरोबा नाल्याला आलेल्या पुरात मोटारीतून  जाणारे दोघे जण वाहून गेले.  व्हिक्टर सांगळे (वय २६) आणि सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. कात्रज परिसरात मोटार वाहून गेल्याने त्यातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी एका महिला आणि मुलाला  वाचविण्याच्या प्रयत्नात नागराज बाळकृष्ण भिल (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. सुमन अजिनाथ शिंदे (वय ६५) यांचाही मृत्यू झाला. ........पुरंदर तालुक्यात भिवडीतील ओढ्याला  आलेल्या पुरामुळे भिवडी येथे गजराबाई  सुदाम खोमणे (वय ७५) आणि छकुली अनंता खोमने (वय २१) या दोघी वाहून गेल्या. भिवडी येथील ओढ्यालागत खोमणे कुटुंबीय राहत होते.  अचानकपने पाण्याचा लोंढा आल्याने संपूर्ण घराला पाण्याने  वेढा घातला होता. ........ 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीfloodपूरRainपाऊसDeathमृत्यू