शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बाजरीच्या भाकरीमधून पाच जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:45 AM

रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे.

परिंचे : येथे रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. रुग्णांवर सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रोग पडलेल्या पिकांची बाजरी खाण्यासाठी न वापरण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नितानेकर यांनी केले आहे.परिंचे, वीर परिसरातील बाजरीवर आर्किड नावाच्या बुरशीचा व आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. बाजरीची पिके जोमात येऊनही या रोगामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे. पुरंदर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन बाजरीपिकाची पाहणी केली होती. पिकांवर पडलेल्या रोगाचे प्रमाण पाहता बाजरीचे धान्य अथवा जनावरांना चारा न घालण्याचे आव्हान कृषी अधिकाऱ्यांनी केले होते. पदरात पडलेले धान्य फेकून कसे द्यायचे व वर्षभर काय खायचे, या भावनेने शेतकºयांनी मात्र बाजरीचे धान्य खाण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या बाजरीच्या भाकरीमधून विषबाधा झाल्याची घटना परिंचेनजीक जोगमळा येथे घडली आहे.नीलेश मारुती जाधव यांच्या घरी संध्याकाळच्या जेवण्यासाठी प्रादुर्भाव झालेल्या बाजरीची भाकरी करण्यात आली. घरातील सर्वांनी रात्री जेवण केले. मध्यरात्रीच्या वेळेस सर्वांना पोटदुखी, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे हा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात सर्वांना उलट्या चालू झाल्या.सर्व रुग्णांना तातडीने परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यावर सर्व रुग्णांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मी जाधव, संतोष जाधव, मंदा जाधव, गणेश चव्हाण, ओम जाधव यांना विषबाधा झाली.सद्य:स्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिरसागर यांनी सांगितले. तसेच दूषित बाजरीचे धान्य न खाण्याचे आवाहन केले.