शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

साखरे वस्तीत पाच एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 23:19 IST

आधीच आयटीपार्कमध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथे काढणीला आलेला सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला. हाती आलेल्या पिकाला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले, यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. शेतातून गेलेल्या एमएसईबीच्या खांबावरील वायर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आधीच आयटीपार्क मध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात काही शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय आजही टिकवून आहे. मात्र, आधीच आसमानी आणि सुलतानी संकटामुळे हवालीदिल झालेला शेतकरी आशा नुकसानकारक घटनांमुळे अजून संकटात सापडलेला आहे. हिंजवडीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी विक्रम साखरे यांच्याशी बोलले असता, गेल्या वर्षी सुद्धा अशीच शेतातील हाती आलेल्या उभ्या पिकाला एमएससीबी च्या खांबावरील वायरच्या शॉर्ट शॉर्टकट मुळे आग लागून  लाखोंचे नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई सोडाच, मात्र, यंदाही असाच प्रकार घडल्यामुळे, शेती करावी की नाही असा प्रश्न हिंजवडीतील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हिंजवडी परिसरात पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, असं का होतंय, याला कोण जबाबदार आहे याची तपासणी करण्याची आग्रही मागणी हिंजवडीतील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

टॅग्स :fireआगPuneपुणे