शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

साखरे वस्तीत पाच एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 23:19 IST

आधीच आयटीपार्कमध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथे काढणीला आलेला सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला. हाती आलेल्या पिकाला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले, यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. शेतातून गेलेल्या एमएसईबीच्या खांबावरील वायर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आधीच आयटीपार्क मध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात काही शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय आजही टिकवून आहे. मात्र, आधीच आसमानी आणि सुलतानी संकटामुळे हवालीदिल झालेला शेतकरी आशा नुकसानकारक घटनांमुळे अजून संकटात सापडलेला आहे. हिंजवडीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी विक्रम साखरे यांच्याशी बोलले असता, गेल्या वर्षी सुद्धा अशीच शेतातील हाती आलेल्या उभ्या पिकाला एमएससीबी च्या खांबावरील वायरच्या शॉर्ट शॉर्टकट मुळे आग लागून  लाखोंचे नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई सोडाच, मात्र, यंदाही असाच प्रकार घडल्यामुळे, शेती करावी की नाही असा प्रश्न हिंजवडीतील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हिंजवडी परिसरात पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, असं का होतंय, याला कोण जबाबदार आहे याची तपासणी करण्याची आग्रही मागणी हिंजवडीतील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

टॅग्स :fireआगPuneपुणे