शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:17 AM

बँक खात्यात होणार जमा; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू सन २०१८-१९ चा ऊस गळीत हंगाम उत्कृष्टरीत्या चालू आहे. या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला रु. २१०० प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे दिली.ते म्हणाले, की कारखान्याने आजअखेर २ लाख १२ हजार ७९० टन उसाचे गाळप पूर्ण करून २ लाख १५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आजचा साखर उतारा १०.५२ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.३० टक्के आहे. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आजअखेर १ कोटी १९ लाख ४६९५१ युनिट वीज एक्स्पोर्ट केली आहे. आसवनी प्रकल्पातून ३४ लाख ९८ हजार ५४६ लिटरचे उत्पादन घेण्यात आले आहे.शेटफळ हवेली तलाव लाभक्षेत्रातील गावांमधील ऊसपिकाला गेल्या मे महिन्यापासून पाणी मिळालेले नव्हते. त्यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या या सर्व उसाची कारखान्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसान सहन करून लवकर तोडणी केली आहे. या उसाला कपात न करता इतर शेतकºयांप्रमाणे दर दिला जाईल. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील पाण्याअभावी जळून चाललेल्या इतर भागातील उसाची शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने तोडणी केली जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याशी संबंधित सर्व घटनांचे अभिनंदन केले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, अशोक वणवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व अधिकारी उपस्थित होते.नीरा भीमा कारखान्याचा चालू गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर हा इतर कारखान्यांच्यातुलनेत निश्चितपणे अधिकचा असेल, अशी ग्वाहीही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच चालू गळीत हंगामात कारखान्याने ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकºयांनी आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने