शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी सहकार विभागाला चार हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 7:39 PM

राज्यातील साडेआठ लाख शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये राज्य शासनाच्या नावाने करंट खाते उघडण्यात आले आहे.बँकांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करुन त्यांना तसे बेबाकी प्रमाणपत्र द्यायचे आहे. कर्जमाफीची रक्कम बँकांना दिली जाणार असून प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार

पुणे : राज्यातील साडेआठ लाख शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली. बँकांनी शेतकर्‍यांना हिरव्या यादीप्रमाणे बेबाक प्रमाणपत्र द्यावे तसेच कर्जमाफीच्या रकमेसाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत असे आवाहनही झाडे यांनी केले आहे.जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये राज्य शासनाच्या नावाने करंट खाते उघडण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीची रक्कम या खात्यांवर दाखविण्यात येणार आहे. बँकांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करुन त्यांना तसे बेबाकी प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्यानंतर बँकांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांची यादी आणि रक्कम याचा प्रस्ताव सहकार विभागाला दिल्यानंतर बँकांच्या खात्यावर सहकार विभागाकडून पैसे जमा करण्यात येणार आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्याशी बँकेच्या प्रस्तावाचा संबंध नाही. शासनाने घोषित केल्याप्रमाणे शेतकरी कर्जमुक्त झालेले आहेत. बँकांनी त्यांना बेबाक प्रमाणपत्र देताच ते सातबारा कोरा करुन घेऊ शकणार आहेत. बँकानी प्रस्तावाची वाट न पाहता त्यांना ही प्रमाणपत्रे द्यावीत. त्यानंतर सहकार विभागाला राज्यभरात शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीचा आकडा द्यावा, त्यानुसार रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल असे झाडे म्हणाले. हिरव्या रंगाच्या यादीतील शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या यादीतील शेतकर्‍यांच्या कागदपत्रांतील त्रुटी दूर करुन त्यांना हिरव्या यादीमध्ये घेऊन दुसर्‍या टप्प्यात त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर लाल रंगाच्या यादीतील शेतकरी पिवळ्या आणि नंतर हिरव्या यादीमध्ये घेऊन त्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीची रक्कम बँकांना दिली जाणार असून प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. राज्यातील एक हजार शेतकर्‍यांनाच आतापर्यंत प्रमाणपत्र देण्यात आलेली असून दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे कामामध्ये खंड पडला आहे. मात्र, येत्या काही दिवसात उर्वरीत शेतकर्‍यांना प्रमाणपत्रं देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बँकांकडून कर्जमाफीच्या रक्कम जमा करण्याचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास शासन अध्यादेशाप्रमाणे ‘पोस्ट आॅडीट’ही करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक