शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसंकटामुळे पर्याय शोधावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 03:56 IST

नागरिकांमध्ये आतापासूनच धास्ती; हॉटेल व्यावसायिकांना अधिक त्रास

पुणे : पुढील काही दिवसांमध्ये पुणेकरांनापाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार पुणेकरांना दररोज ६३५ एमएलडी (दशलक्ष घनलिटर) एवढाच पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढणार असून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे कशा पद्धतीने नियोजन करायचे, हा प्रश्न त्यांना भेडसावेल.या सगळ्या परिस्थितीवर पुणे लोकमत टीमच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यात काही नागरिक, हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संवाद साधण्यात आला. पाणीकपातीमुळे वसतिगृहांतील पाणीवापरावरदेखील मोठ्या प्रमाणात बंधने येणार असल्याचे दिसून आले आहे.हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत पडणार भरपुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींत भर पडणार आहे. शासनासोबत असोसिएशन म्हणून आम्ही पाणी विषयावर भांडू शकणार नाही; मात्र ते जपून व काटकसरीने वापरण्याचा प्रयत्न करू. याबाबत सर्व हॉटेलचालक व असोसिएशन सभासदांना आम्ही पेनकार्ड दिले आहे. यासोबतच ग्राहकांना सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांनी मागितल्याशिवाय पाणी देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. ग्राहकांच्या ग्लासमध्ये शिल्लक राहिलेले पाणी हॉटेलबाहेर ठेवलेल्या बॅरलमध्ये टाकण्यात येणार असून त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी व झाडांसाठी केला जाईल. वास्तविक, पाणीकपातीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनअभ्यासावर होतो परिणामपाणीकपातीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणाकरिता विविध ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यांचे वेळेचे नियोजन ठरलेले असते. पाणीकपातीमुळे आणि पाणी येण्याच्या वेळेमध्ये फरक पडतो. यामुळे सकाळी जमतेम तीन तास कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे पाणी भरून आणि प्रातर्विधी उरकून वाचनालयात किंवा महाविद्यालयात जाण्याकरिता विद्यार्थ्यांना उशीर होतो. याचा परिणाम अभ्यासावर होतो.- सुशील शिंदे, विद्यार्थीग्राहकांना पाणी जपूनच द्यावे लागतेदोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असेल, तर नक्कीच पाण्याची कमतरता जाणवेल आणि सध्याही ते जाणवत आहे. त्यासाठी ग्राहकांना पिण्याचे पाणी जपूनच द्यावे लागते आणि पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही टँकरचा पाण्याचा वापर करतो.- हॉटेल रूपाली (फर्ग्युसन रस्ता)नियोजन कसे करायचे?जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे पुणे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाणी कसे वापरायचे, याचे नियोजन करावे लागणार आहे. कारण सद्य:स्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून २० टक्के पाणीसाठा कमी आहे. पुढील सहा महिने पाणी पुरवण्यासाठी त्याचा जपून वापर करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी पाणी वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरच, ऐन उन्हाळात नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरेल. अन्यथा, पुणे शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते....तर पर्यायी व्यवस्था करावी लागेलग्राहकांना पाणी विचारूनच देतो. पाणी दिल्यास तेही अर्धा ग्लासच देण्यात येते. यामुळे सध्यातरी पाणी पुरवूनच वापरतो. स्वच्छतेसाठी बोरिंगच्या पाण्याचा वापर करतो. मात्र, दोन दिवसाआड पाणी येणार असेल, तर आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. - हॉटेल वाडेश्वरपाण्याचा पुनर्वापर केला जातोसोसायटीमध्ये बोअरवेलचे पाणी येत असल्याकारणाने पाणी समस्या कधीच जाणवली नाही. परंतु, सोसायटीत दिवसांतून दोन वेळा पाणी सोडण्यात येते. याशिवाय, पाण्याचा पुनर्वापर देखील केला जातो. - विशाल ओझा (नागरिक, मार्केट यार्ड)कर्मचाऱ्यांना दिल्या पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचनाग्राहकांनी सांगितल्याशिवाय पाणी देत नाही. तसेच, पेपरच्या छोट्या ग्लासमध्ये पाणी दिले जाते. हॉटेलमध्ये ग्लासातील पाणी अर्धवट प्यायल्यानंतर बाकीचे पाणी फेकून देतात; परंतु आम्ही उरलेल्या पाण्याचा वापर झाडांसाठी अथवा ग्लास धुण्यासाठी करतो. इतकेच नाही, तर आमच्या कर्मचाºयांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. -स्वप्निल गंगवाल (चहा स्टॉल, एफ सी रोड)घरात पाणी नसल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचा उपयोगघरात वापरण्याचे पाणी मिळत नाही. घरात जरी पाणी आले तरी पाण्याचे दाब खूप कमी असतो. सकाळी ५ ते१० या वेळेत पाणी येते; मात्र फार कमी दाबाने पाणी सोडले जाते. घरात शौचालय असून केवळ पाणी नसल्याकारणाने सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो.- लक्ष्मी सुपेकर (रहिवासी, पौड फाटा)

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे