शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कोरोनात महाविद्यालयांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

पुणे : कोरोनामुळे विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. विद्यापीठाने सुमारे बारा वर्षापासून विविध ...

पुणे : कोरोनामुळे विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. विद्यापीठाने सुमारे बारा वर्षापासून विविध अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ केली नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक विना अनुदानित महाविद्यालेय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत गांभिर्याने विचार करून सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या शुल्कात तब्बल बारा वर्षापासून वाढ झाली नाही. त्यामुळे अत्यल्प शुल्कात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिकवले जात आहे. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झाले नाही. त्याचप्रमाणे या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने महाविद्यालये चालवणे संस्थाचालकांना अडचणीचे झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांसाठी एकच नियम लावू नये. विना अनुदानित महाविद्यालयांना शुल्कवाढीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

--

शासनाकडून प्राध्यापक भरतीसाठी परवानगी दिली जात नाही. त्याचप्रमाणे स्वायत्त महाविद्यालय असूनही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास आणि त्याचे शुल्क निश्चित करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे विना अनुदानितच नाही तर अनुदानित अभ्यासक्रम सुरू ठेवणे सुध्दा संस्थाचालकांना अडचणीचे झाले आहे.

- प्रा. शरद कुंटे, अध्यक्ष,डेक्कन एज्युकेशन सोसायटी

---

विद्यापीठाने बारा वर्षापूर्वी निश्चित केलेले शुल्क आकारून सध्य परिस्थितीत महाविद्यालये चालवणे अडचणीचे झाले आहे. शुल्कातून मिळणाऱ्या रक्कमेतून इमारतीचे भाडे, देखरेख आणि प्राध्यापकांचे वेतन देणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही महाविद्यालये बंद पडण्यापूर्वी शासनाने याबाबत मार्गदर्शन करावे.

- शैलेश वाडेकर, विश्वस्त, सरहद

---

विद्यापीठाने गेल्या बारा वर्षांपासून अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ केली नाही. त्यामुळे विना अनुदानित महाविद्यालये चालवणे अडचणीचे झाले आहे. त्यातच अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अट ४० टक्के केली असून कोरोनामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.परिणामी प्राध्यापकांना वेतन देणे सुध्दा शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने यातून मार्ग काढावा.

- डॉ. सुधाकर जाधवर, अध्यक्ष, विना अनुदानित संस्थाचालक संघटना