शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

...अखेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:10 IST

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली होती.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 38 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहेअनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता माणूस कोरोनामुळे गेल्याने कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे

पुणे : न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर राज्य शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना 50 हजार रुपये देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु नक्की किती पैसे व कशा पद्धतीने वाटप करायचे या संदर्भात अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 19 हजार 38 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतेच  सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे देखील स्पष्ट केले. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक फोन व प्रत्यक्ष भेट देऊन पैसे वाटप कधी सुरू होणार याची चौकशी करत आहेत. परंतु या संदर्भात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे लेखी आदेश अथवा सूचना आलेल्या नाही. या संदर्भात दोन दिवसापूर्वी पैसे वाटप करताना रुग्णांचा मृत्यू नक्की कशाने झाला हे स्पष्ट होत नसले तर अशी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली होती. कोरोनामुळं झालेल्या प्रत्येक मृत्यूसाठी कुटुंबाला 50,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. हा पैसा राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मिळणार आहे. सुप्रीम कोर्टानं किमान नुकसानभरपाईबाबत मार्गदर्शक सूचना मागितली होती.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 38 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यात ग्रामीण भागातील 4 हजार 644 लोकांचा मृत्यू झाले आहेत. यात अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता माणूस कोरोनामुळे गेल्याने कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळेच शासनाने मदत देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी ही मदत मिळण्यासाठी लोकांनी गर्दी केली. परंतू शासनाकडून यासंदर्भात कोणत्याही सूचना, अद्यादेश आले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेpimpri-acपिंपरी