शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

वटवृक्षाची दोऱ्याच्या कचाट्यातून अखेर सुटका! पुण्यातील दोन तरुणींचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 18:54 IST

आतापर्यंत दहा - बारा वृक्षांचा कित्येक किलो दोरा काढला असून तो सर्व दोरा त्यांनी महापालिकेच्या कचरावेचकांना सुपूर्द केला

ठळक मुद्देपावसाळ्यात हे दोरे झाडाला आवळून बसतात. त्यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊ लागतो.

पुणे: दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला महिला दोरा गुंडाळून हा सण साजरा करतात. पण नंतर तो दोरा तसाच वडाला कित्येक दिवस राहतो. त्यामुळे वडाचे नुकसानही होते. झाडाचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन तरूणींनी हा दोरा काढून झाडांना मोकळे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत दहा-बारा वृक्षांचा दोरा काढला असून तो कित्येक किलो भरला आहे. तो सर्व दोरा त्यांनी महापालिकेच्या कचरावेचकांना तो सर्व सुपूर्द केला.

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू समजला जातो. पण वडाभोवती दोरा गुंडाळण्याचे ठोस कारण मात्र अद्याप कोणालाही समजलेले नाही. पण या प्रथेमुळे मात्र दरवर्षी अनेक वटवृक्षांना आवळले जाते. त्या वृक्षांच्या भावना दोन तरूणींनी जाणल्या आणि त्यांना मुक्त करण्याचा निर्धार केला. श्वेता शारदा नथू साठे आणि कल्याणी संध्या या दोघींनी हा उपक्रम सुरू केला आहे. श्वेता हिने गेल्या वर्षी या कामाला सुरवात केली होती. त्यानंतर यंदाही कायम ठेवला.

श्वेता ही काही वर्षांपासून अंघोळीची गोळी या मोहिमे अंतर्गत काम करत आहे. झाडांना जीव असतोच आणि त्यांचा सुद्धा जीव गुदमरुन त्यांना सुद्धा दम लागतो. झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की, त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते. जे आपल्याला दिसत नाही आणि हे विघटन अर्धवट होते.  तारा, खिळे ह्यांना गंज लागतो, तो गंज पर्यायाने झाडाला लागतो. दोऱ्यांचेही तसेच आहे. पावसाळ्यात हे दोरे झाडाला आवळून बसतात. त्यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊ लागतो. म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे कल्याणी हिने सांगितले.

एका झाडाचा दोरा काढायला दहा मिनिटे लागतात. तो सर्व एकत्र करून पालिकेच्या कचरावेचकांना देण्यात येतो. मोठ्या वडाच्या झाडाला एका वेळी पाच ते आठ किलो इतक्या वजनाचा दोरा निघतो.

लोकांना झाडांच्या भावना समजून सांगताना श्वेता म्हणते " झाडांचा जीव गुदमरतो म्हणून आम्ही त्यांना मोकळं करतोय. सकाळी उठून हे काम करायला जायला अनेकांना नक्कीच कंटाळा येईल, पण दोऱ्याच्या कचाट्यातून झाडाला मुक्त केल्याचे एक मोठं समाधान नक्की मिळेल. असे श्वेता शारदा नथू साठे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentपर्यावरणSocialसामाजिकWomenमहिला