शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीस गुंठ्यात अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन

By admin | Updated: December 27, 2014 22:58 IST

दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे.

खोर : दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे. ऐके काळी या भागामधील ‘खोरचे वांगे’ पुण्याच्या बाजारपेठेत अग्रगण्य होते. या वांग्याची जागा आता अंजिराने घेतली असून, या भागामधील अंजीर आता पुणे, औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या बाजारपेठेमध्ये नावारूपाला आले आहे.खोरच्या परिसरामधील डोंगराळ भागात डोंबेवाडी वसलेले आहे. हा भाग मात्र डोंगराळ, परंतु शेजारीच असलेल्या डोंबेवाडी पाझर तलावाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरवागार असतो. या भागात सध्याच्या काळात ३५ हेक्टर अंजिराचे क्षेत्र असून, साधारणत: १३ हजारांहून जास्त प्रमाणात अंजिराची झाडे आहेत. अनेक वर्षांपासून पुण्याच्या बाजारपेठेमध्ये या अंजिराला ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. मात्र, अंजीरतोडणी, वाहतूकखर्च, अंजिराची योग्य निवड यांमुळे या भागातील शेतकरीवर्गाला परवडणारे नसल्याने आता एक वर्षापासून औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या ठिकाणचे व्यापारी स्वत: खोर परिसरात येऊन अंजिराचे लिलाव करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा, निवडीचा खर्च वाचला जात आहे.याबाबत माहिती देताना शेतकरी बाळासाहेब नारायण डोंबे म्हणाले, की अंजिराच्या बागांना अगदी रोपे लावल्यापासून फळ बार धरण्यापर्यंत एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. यामध्ये कृषी विभागाच्या नियामानुसार ६ बाय ६ मीटर इतके दोन रोपांमध्ये अंतर ठेवून लागवड केल्यानंतर वाफे तयार करणे, झाडे योग्य मापात आल्यानंतर पानांची छाटणी करणे, रासायनिक खतांचा तसेच रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या खर्च व मजुरीसह एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, अंजिराची उलाढाल ही विक्रमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डोंबे यांनी सांगितले. फळधारणा केल्यानंतर जास्तीत जास्त ४ महिने बार चालतो. यामध्ये प्रतिकिलो ६० रुपये बाजारभाव मिळाला, तरीसुद्धा प्रतिहेक्टर २५ लाखांपर्यंत उत्पादन अंजिराच्या माध्यमातून मिळते. मात्र, पुरंदर जलसिंचन योजना व जनाई-शिरसाई योजना कार्यान्वित झाली, तर या भागाचा मोठा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकरीवर्गामधून बोलले जात आहे.खोर परिसरामधील मोहन डोंबे, रंगनाथ डोंबे, प्रकाश डोंबे, गणेश डोंबे, नाना डोंबे, संभाजी डोंबे, युवराज डोंबे, संतोष डोंबे, राघू डोंबे या शेतकऱ्यांनी अंजिराची विक्रमी लागवड केली आहे.ा अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन