शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वीस गुंठ्यात अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन

By admin | Updated: December 27, 2014 22:58 IST

दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे.

खोर : दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे. ऐके काळी या भागामधील ‘खोरचे वांगे’ पुण्याच्या बाजारपेठेत अग्रगण्य होते. या वांग्याची जागा आता अंजिराने घेतली असून, या भागामधील अंजीर आता पुणे, औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या बाजारपेठेमध्ये नावारूपाला आले आहे.खोरच्या परिसरामधील डोंगराळ भागात डोंबेवाडी वसलेले आहे. हा भाग मात्र डोंगराळ, परंतु शेजारीच असलेल्या डोंबेवाडी पाझर तलावाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरवागार असतो. या भागात सध्याच्या काळात ३५ हेक्टर अंजिराचे क्षेत्र असून, साधारणत: १३ हजारांहून जास्त प्रमाणात अंजिराची झाडे आहेत. अनेक वर्षांपासून पुण्याच्या बाजारपेठेमध्ये या अंजिराला ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. मात्र, अंजीरतोडणी, वाहतूकखर्च, अंजिराची योग्य निवड यांमुळे या भागातील शेतकरीवर्गाला परवडणारे नसल्याने आता एक वर्षापासून औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या ठिकाणचे व्यापारी स्वत: खोर परिसरात येऊन अंजिराचे लिलाव करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा, निवडीचा खर्च वाचला जात आहे.याबाबत माहिती देताना शेतकरी बाळासाहेब नारायण डोंबे म्हणाले, की अंजिराच्या बागांना अगदी रोपे लावल्यापासून फळ बार धरण्यापर्यंत एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. यामध्ये कृषी विभागाच्या नियामानुसार ६ बाय ६ मीटर इतके दोन रोपांमध्ये अंतर ठेवून लागवड केल्यानंतर वाफे तयार करणे, झाडे योग्य मापात आल्यानंतर पानांची छाटणी करणे, रासायनिक खतांचा तसेच रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या खर्च व मजुरीसह एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, अंजिराची उलाढाल ही विक्रमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डोंबे यांनी सांगितले. फळधारणा केल्यानंतर जास्तीत जास्त ४ महिने बार चालतो. यामध्ये प्रतिकिलो ६० रुपये बाजारभाव मिळाला, तरीसुद्धा प्रतिहेक्टर २५ लाखांपर्यंत उत्पादन अंजिराच्या माध्यमातून मिळते. मात्र, पुरंदर जलसिंचन योजना व जनाई-शिरसाई योजना कार्यान्वित झाली, तर या भागाचा मोठा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकरीवर्गामधून बोलले जात आहे.खोर परिसरामधील मोहन डोंबे, रंगनाथ डोंबे, प्रकाश डोंबे, गणेश डोंबे, नाना डोंबे, संभाजी डोंबे, युवराज डोंबे, संतोष डोंबे, राघू डोंबे या शेतकऱ्यांनी अंजिराची विक्रमी लागवड केली आहे.ा अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन