शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

वीस गुंठ्यात अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन

By admin | Updated: December 27, 2014 22:58 IST

दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे.

खोर : दौंड तालुक्यामधील दुष्काळी पट्टा म्हणून खोर भागाची ओळख आहे. मात्र, हाच परिसर आता अंजिराचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्यात अग्रेसर बनला आहे. ऐके काळी या भागामधील ‘खोरचे वांगे’ पुण्याच्या बाजारपेठेत अग्रगण्य होते. या वांग्याची जागा आता अंजिराने घेतली असून, या भागामधील अंजीर आता पुणे, औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या बाजारपेठेमध्ये नावारूपाला आले आहे.खोरच्या परिसरामधील डोंगराळ भागात डोंबेवाडी वसलेले आहे. हा भाग मात्र डोंगराळ, परंतु शेजारीच असलेल्या डोंबेवाडी पाझर तलावाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरवागार असतो. या भागात सध्याच्या काळात ३५ हेक्टर अंजिराचे क्षेत्र असून, साधारणत: १३ हजारांहून जास्त प्रमाणात अंजिराची झाडे आहेत. अनेक वर्षांपासून पुण्याच्या बाजारपेठेमध्ये या अंजिराला ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारभाव मिळतो. मात्र, अंजीरतोडणी, वाहतूकखर्च, अंजिराची योग्य निवड यांमुळे या भागातील शेतकरीवर्गाला परवडणारे नसल्याने आता एक वर्षापासून औरंगाबाद, नांदेड, मालेगाव, परभणी, अहमदनगर या ठिकाणचे व्यापारी स्वत: खोर परिसरात येऊन अंजिराचे लिलाव करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा, निवडीचा खर्च वाचला जात आहे.याबाबत माहिती देताना शेतकरी बाळासाहेब नारायण डोंबे म्हणाले, की अंजिराच्या बागांना अगदी रोपे लावल्यापासून फळ बार धरण्यापर्यंत एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. यामध्ये कृषी विभागाच्या नियामानुसार ६ बाय ६ मीटर इतके दोन रोपांमध्ये अंतर ठेवून लागवड केल्यानंतर वाफे तयार करणे, झाडे योग्य मापात आल्यानंतर पानांची छाटणी करणे, रासायनिक खतांचा तसेच रोगप्रतिकारक कीटकनाशकांच्या खर्च व मजुरीसह एका हेक्टरला १ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र, अंजिराची उलाढाल ही विक्रमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डोंबे यांनी सांगितले. फळधारणा केल्यानंतर जास्तीत जास्त ४ महिने बार चालतो. यामध्ये प्रतिकिलो ६० रुपये बाजारभाव मिळाला, तरीसुद्धा प्रतिहेक्टर २५ लाखांपर्यंत उत्पादन अंजिराच्या माध्यमातून मिळते. मात्र, पुरंदर जलसिंचन योजना व जनाई-शिरसाई योजना कार्यान्वित झाली, तर या भागाचा मोठा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे शेतकरीवर्गामधून बोलले जात आहे.खोर परिसरामधील मोहन डोंबे, रंगनाथ डोंबे, प्रकाश डोंबे, गणेश डोंबे, नाना डोंबे, संभाजी डोंबे, युवराज डोंबे, संतोष डोंबे, राघू डोंबे या शेतकऱ्यांनी अंजिराची विक्रमी लागवड केली आहे.ा अंजिराचे ५ लाखांचे उत्पादन