शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बारामतीतील अंजिर शेती राज्यातील बळीराजांसाठी ठरली 'रोल मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:16 IST

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत.

रविकिरण सासवडे -बारामती : शेतकरी स्वत: मोठा संशोधक असतो असे म्हंटले जाते. कष्ट, जिद्द आणि संशोधनवृत्ती अंगी असेल तर शेतकरी आपल्यासोबत इतरांना देखील मार्गदर्शक ठरू शकतो. बारामती तालुक्यातील निंबूत गावच्या जगताप बंधूंची अंजिर शेती राज्यातील शेतकऱ्यांना रोड मॉडेल ठरली आहे.

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत. निंबुत येथे दीपक जगताप व गणेश जगताप यांनी २००८ साली अंजिर बागेची लागवड केली. अंजिर लावत असतानाच या बागेच्या व्यवस्थापनातील बारकावे त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली. त्यातूनच एका एकरावर असणारी अंजिर बाग ६ एकरापर्यंत वाढवली. मागील वर्षी व यंदाच्या वर्षी देखील अती पावसाने अंजिराचे आगार असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील ७० ते ८० बागांचे नुकसान झाले. करपा आणि तांबेरा या प्रमुख रोगामुळे अनेक अंजिर बागा उद्धवस्त झाल्या. मात्र जगताप बंधूंनी बागेचे केलेले योग्य व्यवस्थापन यामुळे तांबेरा व करपा हे रोग त्यांच्या बागेकडे फिरकले देखील नाहीत. जगताप यांच्या अंजिर बागेमध्ये खट्टा व मिठा असे दोन्ही बहार घेतले जातात. बाजारपेठेचा असलेला अभ्यास आणि फळांची गुणवत्ता यामुळे जगताप यांच्या बागेतील अंजिर एक महिना लवकर मिरज, सांगली, कोल्हापूरच्या बाजारात दाखल होते. बाजारपेठेचा अभ्यास करून बागेचे नियोजन केले जाते. त्यामुळे अंजिर फळांना चांगला दर देखील मिळतो.जगताप यांच्या अभ्यास व संशोधनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी २०१७ साली शासनाने अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादक संशोधक संघाच्या संचालक पदी त्यांची नियुक्ती केली. तर २०१८ साली  दीपक जगताप यांना राज्य शासनाने अंजिर रत्न पुरस्काराने सन्मानित केले. बागेच्या व्यवस्थापनासाठी निंबुत येथील कृषि सहायक प्रविण माने यांचे देखील जगताप बंधूना सहकार्य होत आहे.

- एका एकरामध्ये २०० अंजिर झाडांची लागवड- दोन वर्षानंतर फळ धरण्यास सुरूवात- सुरूवातीला २५ ते ३० किलो एका झाडापासून उत्पादन- बाग दहा वर्षांची झाल्यानंतर एका झाडापासून १०० ते १२५ किलो उत्पादन- जुनमध्ये खट्टा बहार तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिठा बहार धरला जातो.- पूर्ण वाढ झालेल्या बागेपासून एकरी २० टनापर्यंत उत्पादन- सरासरी ६० ते ६५ रूपये किलो दर मिळतो.

शेतीमध्ये परवडत नाही, असे म्हणून चालणार नाही. शेतकऱ्यांनी स्वत: अभ्यासक व्हायला हवे. माझा बंधू गणेश याला पुण्यामध्ये महिना २५ हजार पगाराची नोकरी होती. मात्र आज तो नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करतो.  शेती नफ्यामध्ये आणता येते. त्यासाठी आपल्या शेतीचा अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व बाजारपेठेचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे.- दीपक जगताप, अंजिर रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, (निंबुत, ता. बारामती)

 प्रतिकुल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत जगताप बंधूंनी उभी केलेली अंजिर शेती इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे.- दत्तात्रय पडवळ,तालुका कृषि अधिकारी, बारामती... पुरंदर तालुक्याच्या लगत असणाऱ्या बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी अंजिर शेतीकडे वळायला हवे. यासाठी जगताप यांच्या अंजिर शेती त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.- बालाजी ताटे, उपविभागिय कृषि अधिकारी, बारामती

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीbusinessव्यवसायagricultureशेती