शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील अंजिर शेती राज्यातील बळीराजांसाठी ठरली 'रोल मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:16 IST

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत.

रविकिरण सासवडे -बारामती : शेतकरी स्वत: मोठा संशोधक असतो असे म्हंटले जाते. कष्ट, जिद्द आणि संशोधनवृत्ती अंगी असेल तर शेतकरी आपल्यासोबत इतरांना देखील मार्गदर्शक ठरू शकतो. बारामती तालुक्यातील निंबूत गावच्या जगताप बंधूंची अंजिर शेती राज्यातील शेतकऱ्यांना रोड मॉडेल ठरली आहे.

राज्यभरातून अनेक शेतकरी निंबूत येथे जगताप बंधूंकडून अंजिर शेतीचे धडे घेत आहेत. निंबुत येथे दीपक जगताप व गणेश जगताप यांनी २००८ साली अंजिर बागेची लागवड केली. अंजिर लावत असतानाच या बागेच्या व्यवस्थापनातील बारकावे त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली. त्यातूनच एका एकरावर असणारी अंजिर बाग ६ एकरापर्यंत वाढवली. मागील वर्षी व यंदाच्या वर्षी देखील अती पावसाने अंजिराचे आगार असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील ७० ते ८० बागांचे नुकसान झाले. करपा आणि तांबेरा या प्रमुख रोगामुळे अनेक अंजिर बागा उद्धवस्त झाल्या. मात्र जगताप बंधूंनी बागेचे केलेले योग्य व्यवस्थापन यामुळे तांबेरा व करपा हे रोग त्यांच्या बागेकडे फिरकले देखील नाहीत. जगताप यांच्या अंजिर बागेमध्ये खट्टा व मिठा असे दोन्ही बहार घेतले जातात. बाजारपेठेचा असलेला अभ्यास आणि फळांची गुणवत्ता यामुळे जगताप यांच्या बागेतील अंजिर एक महिना लवकर मिरज, सांगली, कोल्हापूरच्या बाजारात दाखल होते. बाजारपेठेचा अभ्यास करून बागेचे नियोजन केले जाते. त्यामुळे अंजिर फळांना चांगला दर देखील मिळतो.जगताप यांच्या अभ्यास व संशोधनाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी २०१७ साली शासनाने अखिल महाराष्ट्र अंजिर उत्पादक संशोधक संघाच्या संचालक पदी त्यांची नियुक्ती केली. तर २०१८ साली  दीपक जगताप यांना राज्य शासनाने अंजिर रत्न पुरस्काराने सन्मानित केले. बागेच्या व्यवस्थापनासाठी निंबुत येथील कृषि सहायक प्रविण माने यांचे देखील जगताप बंधूना सहकार्य होत आहे.

- एका एकरामध्ये २०० अंजिर झाडांची लागवड- दोन वर्षानंतर फळ धरण्यास सुरूवात- सुरूवातीला २५ ते ३० किलो एका झाडापासून उत्पादन- बाग दहा वर्षांची झाल्यानंतर एका झाडापासून १०० ते १२५ किलो उत्पादन- जुनमध्ये खट्टा बहार तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिठा बहार धरला जातो.- पूर्ण वाढ झालेल्या बागेपासून एकरी २० टनापर्यंत उत्पादन- सरासरी ६० ते ६५ रूपये किलो दर मिळतो.

शेतीमध्ये परवडत नाही, असे म्हणून चालणार नाही. शेतकऱ्यांनी स्वत: अभ्यासक व्हायला हवे. माझा बंधू गणेश याला पुण्यामध्ये महिना २५ हजार पगाराची नोकरी होती. मात्र आज तो नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करतो.  शेती नफ्यामध्ये आणता येते. त्यासाठी आपल्या शेतीचा अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व बाजारपेठेचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे.- दीपक जगताप, अंजिर रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, (निंबुत, ता. बारामती)

 प्रतिकुल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत जगताप बंधूंनी उभी केलेली अंजिर शेती इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे.- दत्तात्रय पडवळ,तालुका कृषि अधिकारी, बारामती... पुरंदर तालुक्याच्या लगत असणाऱ्या बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी अंजिर शेतीकडे वळायला हवे. यासाठी जगताप यांच्या अंजिर शेती त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.- बालाजी ताटे, उपविभागिय कृषि अधिकारी, बारामती

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीbusinessव्यवसायagricultureशेती