शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ST Strike: बदल्यांच्या भीतीने एसटी कर्मचारी कामावर, पुण्यातील पाचवा आगार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:21 IST

संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने शनिवारपासून संपात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यास सुरुवात केली आहे

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने शनिवारपासून संपात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून ते आता कामावर परतत आहेत. रविवारी पुणे विभागातील पाचवा आगार सुरू झाला आहे. रविवारी बारामती आगाराच्या २० साध्या गाड्या जिल्ह्यात विविध ठिकाणी धावल्या. रविवारपासून बारामतीच्या रूपाने पुणे विभागाचा पाचवा आगार सुरू झाला. या आधीच स्वारगेट, शिवाजीनगर, दौंड,चिंचवड असे चार आगार सुरू झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे अन्यथा त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करू असा इशारा दिला. मात्र ते शक्य नसल्याने एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू केले. शनिवारी पुणे विभागातील ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याचा परिणाम रविवारी दिसून आला. रविवारी बारामती आगाराच्या ४० वाहक व चालक कामावर परतले. त्या नंतर बारामतीमधून परिवर्तन बसची वाहतूक सुरू झाली. बारामतीहुन नीरा, भिगवण, फलटण, जेजुरी, दौंड या ठिकाणसाठी गाडी धावल्या.

''रविवारी बारामती विभागातून एसटीची वाहतूक सुरू झाली. कर्मचारी आता कामावर परतत आहेत. बारामती आगारातून २० गाड्या धावल्या आहेत असे पुणे  विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रनवरे यांनी सांगितले आहे.'' 

आम्ही मागे हटणार नाही 

''कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना भीती दाखवली जात आहे; पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. प्रशासनाला कोणती कारवाई करायची ती करू द्या. आम्ही आता मागे हटणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.'' 

टॅग्स :ST Strikeएसटी संपPuneपुणेGovernmentसरकारAnil Parabअनिल परब