शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

शिक्षक बदल्यांवरून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:57 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया एनआयसीमार्फत आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया एनआयसीमार्फत आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेत अनेक गोंधळ झाल्याने शिक्षक विस्थापित झाले होते. या बदली प्रक्रियेचे पडसाद बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सदस्यांनी एनआयसीमार्फत राबविलेल्या या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत त्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनीही बदली प्रक्रियेतील गोंधळ मान्य करत यात जिल्हा परिषदेची बदमानी होत असल्याचे सांगत सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याच्या सूचना करून तो अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, तसेच बदलीचे अधिकार पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेलाच मिळण्यासाठी शिफारस करण्यात येईल, असे सांगितले.जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बदली यावर्षी राज्यशासनाच्या धोरणानुसार आॅनलाईन पद्धतीने झाल्या. ही प्रक्रिया एनआयसीमार्फत तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, यात अनेक शिक्षक विस्थापित झाले, तर काही शाळांवर दोन शिक्षकांची नेमणूक झाली. याबाबत जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी प्रश्न उपस्थित करीत या बदल्यांवर आक्षेप घेतला. एनआयसी आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून लाखोंनी पैसे घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाल्याचा आरोप करीत आजही शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. या सर्व प्रक्रियेची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या सूचनेला वीरधवल जगदाळे यांनी अनुमोदन देऊन तसा ठराव मांडण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी ही प्रक्रिया राबविताना शिक्षकांनी भरलेली माहिती कुणी तपासली, शिक्षण विभागाला त्यांची माहिती कुणी दिली, याचा जबाब अध्यक्षांना विचारला.उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील म्हणाले, की एनआयसीमार्फत तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरद्वारे या बदल्या करण्यात आल्या. मात्र, त्यात अनेक त्रुटी असून त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला आहे. या सॉफ्टेवअरबाबत थेट शिक्षणमंत्री तसेच शिक्षण सचिव आणि संचालकांनाच माहिती नाही. सुगम तसेच दुर्गम भागाचेही त्यात योग्य वर्गीकरण करण्यात आलेले नाही. तसेच, अंतराच्या बाबीही चुकीच्या पद्धतीने भरल्या गेल्याने अनेक शिक्षकांना याचा फटका बसला. ही संपूर्ण प्रक्रिया राज्यस्तरावरून राबविण्यात आली. शासन स्थानिक स्वराज्य संस्थेत हस्तक्षेप करून अधिकारांवर मर्यादा आणत आहे. सर्व सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन अहवाल शासनाला पाठविला जाईल.तक्रारींचा अहवाल तयार करण्यात येईलसदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, की जिल्हा परिषदेची शिक्षकांची बदली प्रक्रिया ९० टक्के योग्य पद्धतीने झाली आहे. उरलेल्या १० टक्के शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. बदली प्रक्रि येत गोंधळ झाला असला तरी सर्वांच्या तक्रारी मागवून त्याचा अहवाल तयार करण्यात येऊन तो शासनाला पाठविण्यात येईल.