शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बारामती-वालचंदनगर रस्त्यावरील अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:40 IST

संबंधित बांधकाम अधिकारी,रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...

डोर्लेवाडी (पुणे) : बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकी व हायवा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनगाव (ता. बारामती) येथे घडली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामदास पवार (वय-३८) व त्यांचा मुलगा आर्यन सतीश पवार (वय- १२ रा. दोघेही आसू ता. फलटण जि. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पवार व त्यांचा मुलगा हा बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकीवरून घरातून बारामतीकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हायवाने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या अपघातात वडील सतीश पवार यांचे जागेवरच निधन झाले. तर आर्यन याच्या डोक्याला मोठ्या प्रामाणात जखमा झाल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बारामती ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश पवार तपास करीत आहेत.

दरम्यान, अशाच पद्धतीच्या हायवाने मागील महिन्यात २९ जुलैला लहान मुलाला चिरडल्याची घटना सोनगाव (ता. बारामती) घडली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळू उपसा होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे. महसूल प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थनिक नागरिक करीत  लागले आहेत. त्यामुळे अशा हायवा चालकांवर पोलीस व महसूल प्रशासन काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रोडवर गतिरोधक टाकण्याची वारंवार मागणी-बारामती वालचंदनगर रस्त्याचे काहि दिवसांपूर्वी काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मागावर वेगाने वाहने जातात. परिणामी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या मार्गावर  गतिरोधक टाकण्याची मागणी सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा करण्यात आली आहे. संबंधित रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहेत.

....संबंधित बांधकाम अधिकारी,रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-

जाणीवपूर्वक अधिकारी गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, यामुळेच वारंवार अपघात घडत आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम अधिकारी आणि या रस्त्याचे ठेकेदार  जबाबदार असून त्यांच्यावरच आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे