शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-वालचंदनगर रस्त्यावरील अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:40 IST

संबंधित बांधकाम अधिकारी,रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...

डोर्लेवाडी (पुणे) : बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकी व हायवा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनगाव (ता. बारामती) येथे घडली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामदास पवार (वय-३८) व त्यांचा मुलगा आर्यन सतीश पवार (वय- १२ रा. दोघेही आसू ता. फलटण जि. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकाची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पवार व त्यांचा मुलगा हा बारामती-वालचंदनगर मार्गावर दुचाकीवरून घरातून बारामतीकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हायवाने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या अपघातात वडील सतीश पवार यांचे जागेवरच निधन झाले. तर आर्यन याच्या डोक्याला मोठ्या प्रामाणात जखमा झाल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बारामती ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश पवार तपास करीत आहेत.

दरम्यान, अशाच पद्धतीच्या हायवाने मागील महिन्यात २९ जुलैला लहान मुलाला चिरडल्याची घटना सोनगाव (ता. बारामती) घडली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळू उपसा होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहे. महसूल प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थनिक नागरिक करीत  लागले आहेत. त्यामुळे अशा हायवा चालकांवर पोलीस व महसूल प्रशासन काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रोडवर गतिरोधक टाकण्याची वारंवार मागणी-बारामती वालचंदनगर रस्त्याचे काहि दिवसांपूर्वी काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मागावर वेगाने वाहने जातात. परिणामी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या मार्गावर  गतिरोधक टाकण्याची मागणी सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा करण्यात आली आहे. संबंधित रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहेत.

....संबंधित बांधकाम अधिकारी,रस्त्याच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-

जाणीवपूर्वक अधिकारी गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, यामुळेच वारंवार अपघात घडत आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम अधिकारी आणि या रस्त्याचे ठेकेदार  जबाबदार असून त्यांच्यावरच आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे